Mahavikas aghadi maha morcha : बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात घेणारच ; उद्धव ठाकरेंनी ठणकावले!

Mahavikas aghadi maha morcha : महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर नाचायची हीच वेळ!
Mahavikas aghadi maha morcha :
Mahavikas aghadi maha morcha : Sarkarnama

Mahavikas aghadi maha morcha : महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरूवात झाली मोर्चात महाविकासआघाडीतील सर्वत पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहिले. यावेळी सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी, भाजप, शिंदे गट, राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी सभेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले, बऱ्याच काळानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असाणार. माझ्याबरोबबर लाखो महाराष्ट्रप्रेमी फक्त माझ्यासोबत चालणार नाहीत, तर ते महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर नाचणार आहेत. ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर नाचण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर असं दृश्य देशाने आज पाहिलं असेल. बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाह, हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. सर्व पक्ष एकवटलेत पण जे महाराष्ट्रद्रोही आहेत ते इथे नाहीत.

Mahavikas aghadi maha morcha :
शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांची गर्जना

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल मानतच नाही. राज्यपाल पदावरबसून कोणावरही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. केद्रामध्ये जो बसतो,त्यांच्या घरी काम करणारा माणूस राज्यपाल पदी नको. स्वत:ला जे बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जात आहोत, असे म्हणत आहेत, ते खरंतर तोतये आहेत.या तोतयांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे आहेत. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही.आणि असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही शिवसेना आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

Mahavikas aghadi maha morcha :
Mahavikas aghadi maha morcha : महामोर्चात न येण्याचं अशोक चव्हाणांनी दिले 'हे' कारण...

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले नसते तर आज आपण कुठे असतो. त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी 'भीक' शब्द वापरून दाखवून दिलं आहे. जर त्यावेळी सावित्रीबाईंनी शेणाचा मार सहन केला नसता, तर आज आपण कुठे असतो? त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. फुल्यांनी जर शाळा सुरू केले नसते तर, आपणही यांच्या मंत्रीसारखे बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. ही वैचारिक, बौद्धिक दारिद्रय असलेले हे लफंगे लोक आहेत. यांना छत्रपतीचं नाव घेण्याचा या लफंग्यांना अधिकार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com