हंडोरेंच्या पराभवाने काॅंग्रेसमध्ये खळबळ; बाळासाहेब थोरात राजीनाम्याच्या मूडमध्ये ?

कॉंग्रेसची मते फुटल्याचे मान्य करत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाराजी व्यक्त केली.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या आमदारांचीच काही मते आम्हाला मिळाली नाहीत, हे मान्य करावे लागेल. माझी भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार आहे. या स्थितीत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) म्हणूनदेखील विचार करावा लागणार आहे. सरकारला अडीच वर्षे झाली आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले. या निकालामुळे नाराज झालेले महसूलमंत्री थोरात हे राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आणि काॅंग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यापैकी ते कशाचा राजीनामा देणार, याबाबत अद्याप त्यांनी ठरविलेले नाही.

Balasaheb Thorat
एकनाथ शिंदेंची नाराजी शिवसेनेला भोवली?; 11 मतांना भाजपचा सुरुंग...

कॉंग्रेसची मते फुटल्याचे मान्य करत स्वत: बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ मते फुटली याची सर्व जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. यावर आम्ही निश्‍चितपणे विचार करू. पक्ष म्हणून आमचा दोष आहे. इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. मात्र, महाविकास आघाडी म्हणून विचार करण्याची गरज आहे. सरकार म्हणूनदेखील यावर विचार करण्याची गरज आहे.’’

Balasaheb Thorat
ठाकरे सरकारला धक्का : महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली

कॉंग्रेसची स्वत:ची ४४ मते असताना कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना अनुक्रमे २२ व १९ मते मिळाली.पहिल्या पसंतीक्रमात हंडोरे यांना २६ मतेदेखील मिळविता आली नाहीत. परिणामी दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला.भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने सलग दुसऱ्यांदा महाविकास आघाडीचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले. या निकालानंतर काॅंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दलित उमेदवार हंडोरे यांना पक्षांतर्गत गटबाजीमुळे पाडल्याचा आरोप माजी खासदार संजय निरूपम यांनी केला. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे निकालाआधीच नागपूरला निघून गेले. तेव्हाच काॅंग्रेस धोक्यात असल्याची चर्चा होती.

निकालात सर्वाधिक नुकसान कॉंग्रेसचे झाले असून पक्षाची मते फुटल्याने याचा परिणाम राज्य सरकार परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराला पहिल्या फेरीतला कोटादेखील पूर्ण करता न आल्याने कॉंग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. पक्षात गटबाजी नाही. आम्ही सारे एकत्र आहोत. मात्र, नेकमे काय झाले. मते कशी फुटली याचा विचार करावा लागेल, असे थोरात यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com