Congress agitation | बाळासाहेब थोरात संतापले : म्हणाले, सरकारने सामान्यांच्या भाकरीवर कर लावला...

आमदार बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर टीका केली.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Congress agitation : मुंबई - राज्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राजभवन घेराव व जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती मात्र पोलिसांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. यावेळी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर टीका केली.

मुंबई आणि परिसरातून 10 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. विधान भवनातून बैठक आटोपून राजभवनाचा घेराओ करायला निघालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार अमर राजूरकर, वजाहत मिर्झा, अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना पोलिसांनी विधानभवन परिसरातून अटक केली. तर मलबार हिल परिसरातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस राजेश शर्मा यांना अटक केली.

Balasaheb Thorat
Baban Thorat : कोण आहेत शिवसेनेचे बबन थोरात, घ्या जाणून !

या प्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले, देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. सरकारने सामान्यांच्या भाकरीवर कर लावला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराव घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची धरपकड केली. विधान भवनातून आंदोलनासाठी जात असतानाच काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली. ईडी सरकारने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला मात्र अशा कारवायांना काँग्रेस जन घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू अशा इशारा त्यांनी दिली. गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी ईडी सरकारच्या काळात आंदोलनाचा अधिकार नाही. काय असा संतप्त सवाल थोरात यांनी केला.

Balasaheb Thorat
शिवसेनेच्या 'त्या' भूमिकेवर काँग्रेस नाराज : बाळासाहेब थोरात म्हणाले...

ब्रिटिश राजवटीत सुद्धा आंदोलन करता येत होते. आपण लोकशाहीत आहोत पण राज्य सरकार जनतेच्या प्रश्नावरील आंदोलन करण्यापासूनही रोखत आहे. केंद्र सरकारने मुलांच्या दुधावर जीएसटी लावला, मीठवर, पीठावरही जीएसटी लावला. महागाईने जनता त्रस्त असताना सरकारला जाब विचारायचा नाही का ? हे कसले सरकार.. ईडी सरकारच्या राज्यात आंदोलन करण्यावरही बंदी आहे का? ब्रिटिशांच्या काळातही लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला बंदी नव्हती, असे त्यांनी सांगितले.

महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com