rajya sabha result : दोन आमदारांच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे एक मत बाद

भाजपचे आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे कांदेचं मत बाद झालं.
Ashish Shelar, Suhas kande, Nilesh Rane
Ashish Shelar, Suhas kande, Nilesh Ranesarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने (bjp) घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे (shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत बाद ठरवण्यात आले. यावरुन राजकारण तापलं आहे. सुहास कांदे यांचे मत नेमकं बाद तरी कसे झाले, त्यांचे मत बाद होण्यामागे महत्वाची भूमिका कोणी बजावली याबाबत सध्या समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात भाजपच्या दोन आमदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. भाजपचे आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे कांदेचं मत बाद झालं.

राणे कुटूंब आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्राला नवा नाही, अनेकदा शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र आता राज्यसभा निवडणुकीवेळी नितेश राणेंमुळे शिवसेनेचे एक मत बाद झाल्यानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

काल राज्यसभा निवडणूकी दरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे पोलिंग एजंटची भूमिका बजावत होते. यावेळी नितेश राणे यांना सुहास कांदे यांनी मतदान करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे जाणवले. त्यांनी ही बाब आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेत हे मत बाद करण्याची मागणी केली.

Ashish Shelar, Suhas kande, Nilesh Rane
आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोमणा

भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महिला आणि बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकुर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवलं. सुहास कांदे यांचे मत हे संजय राऊत यांच्या कोट्यातील होते.

राज्यसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यावर विजयाचं गणित अवलंबून होतं. त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी बाजूनं जोरदार घोडेबाजार रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. निवडणुकीनंतर 'घोडेबाजार'वरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला टोमणा लगावला आहे. फडणवीस माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com