Mumbai : राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्याचा आदेश राज्य सरकारकडून आज काढण्यात आला आहे. तर याआधीही 2 जूनला राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून फेरबदल करत बदल्या केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नितीन करीर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याआधी देवरा हे नियोजन विभागात कार्यरत होते.
संजय खंदारे यांची प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग, तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर एस जगताप यांची उपमहासंचालक यशदा तर जितेंद्र डुड्डी सीईओ जिल्हा परिषद सांगली यांची सातारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची मदत व पुनर्वसन विभागात तर या ठिकाणी असलेले असीम कुमार गुप्ता यांची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे. सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांची कृषी विभाग, राधिका रस्तोगी यांची पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवपदी तर या ठिकाणी असलेले विजय सौरभ यांची नियोजन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Edited By-Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.