
मुंबई : मुंबई काँग्रेसचे विधान परिषद सदस्य राजेश धोंडीराम राठोड (Rajesh Rathod) यांची काँग्रेसच्या (Congress) पक्षप्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आमदार राठोड यांच्याकडे पक्षप्रतोदपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आमदार राठोड यांनी यापूर्वी जालना जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद सभापती, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशा विविध पदावर काम केले आहे. बंजारा समाजाचे ते लोकप्रिय नेते असून त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो.
दरम्यान, आमदार राठोडांची पक्षप्रतोदपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक क्रॅाग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : संजय पांडे शिवसेनेत प्रवेश करणार का? अखेर राऊतांनीच दिलं उत्तर
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे, राणा दांपत्याला अटक, किरीट सोमय्यांवर हल्ला, अशा अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संदर्भात केलेल्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
सोमय्या म्हणाले, संजय पांडे हे शिवसेनेच्या आदेशानुसार काम करतात. संजय पांडे यांना येत्या दीड महिन्यात शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, असा गोप्यस्फोट सोमय्या यांनी केला. संजय पांडे यांनी माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पांडे हे 'मातोश्री'चे पोलीस आयुक्त म्हणून माफिया गिरी करणार असतील तर पांडे यांना सोडणार नाही.
संजय पांडे शिवसेनेत प्रवेश करणार, या सोमय्या यांच्या दाव्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, आधीच्या आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि खासदार झाले ते चालते का? ते त्यांच्या पालख्या उचलत आहेत. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कायदेशीर कारवाई केली तर त्यांच्यावर शिक्का मारता? राजेश्वरसिंग ईडीचे जॉइंट डायरेक्टर होते ते भाजपत सामिल झाले आणि आमदारकीची निवडणूक जिंकली. इतर अनेक राज्यातील पोलीस आयुक्त, आयएएस अधिकारी भाजपमध्ये सामिल झाले. त्यासंदर्भात भीजपचे काय म्हणणे आहे. त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान देत राऊत यांनी सोमय्या यांच्या दाव्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवाराला सोडले नाही, तर संजय पांडे 'किस खेत की मुली है' असे सोमय्या म्हणाले. राज्यपालांची भेट घेऊन पांडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, येत्या 15 दिवसांत राज्यात ऍक्शन दिसेल असा इशारा सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला. गरज पडल्यास या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयातही जावू, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.