साम-दाम-दंड-भेद सर्व करून झालं, पण परबांच्या हाती काही लागेना!

राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी परबांना पूर्णपणे मोकळीक दिल्याचे समजते.
Anil Parab
Anil Parab Sarkarnama

मुंबई : जवळपास दीड महिन्यापासून संपाचा हत्यार उपसलेल्या एसटी कामगारांची (ST Strike) समजूत काढण्यात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना अद्याप यश मिळताना दिसत नाही. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यावर कामगार ठाम आहेत. हा संप मिटवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व करून झालं तर परबांच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. त्यामुळं एसटीच्या तोट्याचा डोंगर वाढतच चालला आहे.

एसटीच्या कामगार संघटनांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला होता. हा संप फार काळ चालणार नाही, असंच सुरूवातीला सरकारला वाटत होतं. विलीनीकरणासाठी सुरू झालेला संप पगारवाढ किंवा आश्वासनांवर नेहमीप्रमाणे मागे घेतला जाईल, अशी आशा सरकारला होती. सुरूवातीला कामगार संघटनांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले. पण हा संप संघटनांच्या हातातून थेट कामगारांनीच हातात घेतला.

Anil Parab
शशी थरूर महाबळेश्वरला लग्नाला आले अन् प्रश्न पडला...नक्की नवरदेव कोण?

भाजपच्या नेत्यांनीही त्यात उडी घेत संपाला धार देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पगारवाढीच्या आश्वासनानंतर संपातून अंग काढून घेतलं. तोपर्यंत सरकारकडून निलंबन, बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली. पगारवाढीची अंमलबजावणीही सुरू झाली. एसटी कामगारांमधील काही नेत्यांना हाताशी धरून संप मिटवण्याचा प्रयत्नही झाला. पण कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठामच आहेत.

संप कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. सरकारने परिवहन मंत्र्यांना हा संप मिटवण्यासाठी पूर्ण मोकळीक दिलीय .एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी न्यायालयात याचिकाकर्ते अजय कुमार गुजर यांची नुकतीच परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची महिती आहे. या बैठकीत गुजर यांनी कर्मचऱ्याना समान पाच हजार रुपयांची वाढ द्यावी अशी मागणी केली होती. ही मागणी सध्या पूर्ण करणं शक्य नसल्याचं म्हणत सरकारने तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.

Anil Parab
रायगडाचे पावित्र्य जपा...नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण करू नका!

विलीनीकरण संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सरकार त्यावर वेगळी भूमिका सध्या तरी घेणार नाही असं चित्र आहे. गेल्या महिना भरापासून संपात सहभागी कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा पगार देखील मिळालेला नाही. कर्मचारी आर्थिक सक्षम नाहीत. त्यामुळे संप सुरूच राहिल्यास कुटुंबाचा आर्थिक प्रश्न भेडसावू शकतात. तसेच दररोज कारवाईही होत आहे. त्यामुळे संप मिटवणं सध्या तरी गरजेचं असल्याचं कर्मचारी संघटनांना वाटतं. पण कर्मचारी ठाम असल्यानं यातून तोडगा निघताना दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com