'खोटे सिक्के खुद नहीं चले बाजार में'; अमोल मिटकरींचा विरोधकांना टोला

MahaBudgetSession2022| Budget2022 कोरोनामुळे मंदावलेल्या आर्थिक विकासाला गती देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.
Amol Mitkari
Amol Mitkari

मुंबई: महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे नेतृत्त्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, या संत तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून सत्तेत आले, तेव्हापासून राज्यावर अनेक संकटे येत गेली, परंतु राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व संकटांचा सामना अतिशय धैर्याने केला आणि महाराष्ट्राला संकटातून सावरले, अशा शब्दातं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांंनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. राज्याच्या आर्थिक पहाणी अहवालानुसार परदेशी गुंतवणुकीचा 28 टक्के वाटा आहे. देशाचा विकासदर 8 टक्क्यांवर असताना महाराष्ट्राचा विकासदर 12 टक्क्यांवर पोहचला आहे. महाराष्ट्राचा हा विकास परग्रहावरील कोण्या माणसाने केलेला नाही. परंतु एखाद्या सरकारला केवळ बदनाम करायचे आणि त्या सरकारने चांगली कामे केलेली असतानाही ती मान्यच करायची नाही.

Amol Mitkari
मोदींनी ठरवलं तर ई-वाहनधारकांची 'बल्ले बल्ले' होणार!

राज्याला आणि राज्यातील जनतेला प्रगतीपथावर नेणारा विकासाचा पंचसुत्री संकल्प करून कोरोनामुळे मंदावलेल्या आर्थिक विकासाला गती देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. जीएसटीचा पैसा केंद्रात रखडला असतानाही मागच्या काळात राज्यातील आमदारांना विकास निधी वाढवून दिला. अर्थसंकल्प कितीही चांगला असला तरी विरोधक त्यामध्ये केवळ उणीवाच शोधतील.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम झाल्याचा आरोप राज्य सरकारवर होत आहे पण राज्य सरकारने शेतकऱ्याला केंद्रबिंदू धरले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात अनेक योजना सरकारने तयार केल्या आहेत. अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या महत्त्वपूर्ण योजना मिटकरी यांनी सभागृहात मांडल्या.

अर्थसंकल्पाचा एका शब्दात उल्लेख करायचा तर चार राज्यातील विजयाचा आनंद व्यक्त करताना विरोधकांनी दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पाहीला आणि त्यांचा आनंद हवेत विरघळून गेला. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी विकास निधी जाहीर करण्यात आला, त्यासाठी मिटकरी यांनी राज्य सरकारचे आभार मानले. शिवाय विदर्भ आणि अकोला जिल्ह्यात विकास कामांसाठी काही राहून गेले असेल तर आपण पाठपुरावा करून अजितदादांकडे मागणी करू, महाविकास आघाडी सरकार आपल्याला नाराज करणार नाही असे मिटकरी म्हणाले. राज्याचा सुंदर अर्थसंकल्प मांडण्यात आला तरीदेखील सातत्याने विरोधक यावर टिका करतात त्यासाठी "आंधळ्यासी जन अवघेची आंधळे आपणासी डोळे दृष्टी नाही, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोडासी कारण चवी नाही, तुका म्हणे शुध्द नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे." या संत तुकाराम महाराजांच्या ओव्या मांडून विरोधकांना चांगलाच टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com