Sharad Pawar : 'त्या' सर्व निर्णयांची चौकशी व्हायला हवी ; कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवार असं का म्हणाले?

कोश्यारी यांच्या राजीनाम्याचा अतिशय चांगला निर्णय याआधीच घ्यायला पाहिजे होता.
Sharad Pawar |Bhagatsingh Koshyari
Sharad Pawar |Bhagatsingh Koshyari Sarkarnama

Sharad Pawar On Bhagatsingh Koshyari : आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली. महाराष्ट्राची सुटका झाली आहे, पण राज्यपालांनी संविधानाच्या विरोधात घेतलेल्या त्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज (१२ फेब्रुवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मंजूर केला. त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान राज्यपालांच्या राजीनामा मंजूरीवर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "राज्यपाल बदलण्याचा निर्णय हा अतिशय चांगला आहे. पण हा निर्णय फार आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल कधीच झाली नव्हती. राष्ट्रपतींनी राज्यपाल बदण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय समाधानकारक आहे. जे जे संविधानाच्या विरोधात झालं असेल, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar |Bhagatsingh Koshyari
Kasba by-election : कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय'; बापटांचे मुख्यमंत्री शिंदेंना आश्वासन

माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्याचा अतिशय चांगला निर्णय याआधीच घ्यायला पाहिजे होता. पण तो आता घेतला गेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती आपण पाहिली. पण, केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांनी त्यामध्ये बदल केला आहे. ही अतिशय समाधानकारक बाब आहे.

महाविकास आघाडी सरकार कार्यकाळात राज्यसरकार आणि कोश्यारी यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादीमुळे दोघांमध्ये मोठे मतभेद झाले होते. त्यातच त्यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही त्यांना विरोधकांसह जनतेच्याही रोषाचा सामना करावा लागला होता.

महाविकास आघाडीने संरपंचाच्या निवडीबाबत घेतलेला निर्णयावरुनही आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये मतभेद झाले होते. इतकेच नव्हे तर, अलीकडेच, राज्यपाल भवनाकडे शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तास्थापनेचे पत्रच नाही, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली होती. यामुळे विरोधी पक्षांनी राज्यपालांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे वाद दिवसेंदिवस वाढत होते.या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनाम्याचे पत्र दिले. त्यानंतर आज राष्ट्रपतींनी कोश्यांरीचा राजीनामा मंजूर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com