
Akhil Bhartiya Bailgada Sanghatna Meeting : बैलगाडा शर्यतीच्या टोकन फी पुन्हा परत न करणाऱ्या घाटात बैलगाडा धावणार नाही, अशी थेट भूमिका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने घेतली आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने घेतलेला हा निर्णय बैलगाडा मालकांच्या हिताचा असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयाला अनेक बैलगाडा मालकांनी पाठींबाही दिला आहे.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषात बैलगाडा शर्यत संपल्यावर टोकन फी परत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. पण असे असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांकडून बैलगाडा मालकांना टोकन फी पुन्हा परत केली जात नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
दोन हजार ते पाच हजारादरम्यान असलेली बैलगाडा मालकांची 'टोकन फी' आयोजक परत देत नसल्याच्या अनेक तक्रारी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडे करण्यात आल्या आहेत. यानंतर आखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आक्रमक भूमिका घेत थेट शर्यतीच्या टोकन फी पुन्हा परत न करणाऱ्या घाटात बैलगाडा धावणार नाही, असा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांनी एका वृत्तवाहीनीशी बाेलताना दिली.
तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी टोकन फी परत करणार नसल्याची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यती भरविण्यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, यावर आता काय मार्ग काढला जातो, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.