
मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पैठण मतदारसंघ येथील मुख्यमंत्र्याच्या सभेसंदर्भात बाल विकास अधिकाऱ्याने काढलेलं पत्रक कालपासून वादाचा विषय होता. यावरूनच आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी जर अंगणवाडी सेविकांना, पर्यवेक्षकांना आदेश दिले जात असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. अशी पद्धत महाराष्ट्राची कधीच नव्हती.
दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेसंदर्भात पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या पत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. हे पत्र बनावट असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते.
याचवेळी त्यांनी राज्यातील लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाबाबत भाष्य करत राज्य सरकारचं याकडे लक्ष वेधलं आहे. राज्यातील शेकडो जनावरे लम्पीग्रस्त झाली आहेत. अनेक जनावरे दगावली आहेत याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जनजीवनावरही होणार आहे. गाळप हंगाम सुरु झाल्यावर लम्पीचा प्रसार वाढेल, लम्पी आजारामुळे दुग्धव्यावसायावर परिणाम होणार आहे. आजारग्रस्त गाईचे दुध प्यायल्यावर काही परिणाम होतो का, त्याबाबत राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.