सरकारला पूरग्रस्तांची चिंता नाही : विरोधी पक्षनेते अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar | NCP | Eknath Shinde : राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे...
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News Sarkarnama

मुंबई : राज्यातील दोघांच्या सरकारला शेतकऱ्यांची, पूरग्रस्तांची चिंता नाही, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार म्हणाले, मी नुकताच दौरा करून आलो आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सोयाबीनवर रोग पडला आहे. फळबागांचं खूप नुकसान झाले आहे. पीकविम्याबद्दल पुढे काय होणार हे कळायला शेतकऱ्यांना मार्ग नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि खरीप पिकाला हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबाग नुकसानाला हेक्टरी दीड लाख रुपये मदत दिली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली. (NCP | Ajit Pawar Latest News)

अजित पवार पुढे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे नाहीत. केंद्रीय पथकाकडून अद्याप पाहणी नाही. काही ठिकाणी आर्थिक मदत मिळाली. मात्र अदयाप अनेक शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. अधिकाऱ्यांनी मदतीचे प्रस्ताव पाठविले आहेत, पण अजून मदत झालेली नाही. लोकांची घर कोसळली आहेत. घरातील कपडे, धान्यांचं आतोनात नुकसान झाले आहे. दुकानातील मालाचे, धान्याचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांची सरकारला चिंता नाही, असाही आरोप त्यांनी केला. (NCP | Ajit Pawar Latest News)

यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना मदती मिळवून देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय दौरे सुरु आहेत. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा त्यांचा अधिकार आहे. पण नाशिक, औरंगाबाद किंवा इतर भागात ते गेले तिथे मिरवणुका सत्कार सुरु आहेत. आम्ही पण कधी काळी उपमुख्यमंत्री होतो, असा टोलाही त्यांनी लगावला. (NCP | Ajit Pawar Latest News)

राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना पवार म्हणाले, एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही विलंब का होत आहे? मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुणाची वाट पाहताय? मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये होतो, त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांना विचारले, तर सांगितले उपमुख्यमंत्र्यांवर कसलीही जबाबदारी नाही. सगळ्या कामांची जबाबदारी केवळ मुख्यमंत्र्यांवर आहे. काहीही झालं की प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते, असेही अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com