Ajit Pawar On Dhirendra Maharaj : धीरेंद्र शास्त्रींच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवार संतप्त; म्हणाले...

Maharashtra Politics : महापुरुषांचा अपमान करण्याचं काही जणांचं काम जाणीवपूर्वक चाललं आहे.
Ajit pawar On Dhirendra Shastri
Ajit pawar On Dhirendra Shastri Sarkarnama

Ajit Pawar On Dhirendra Shastri Maharaj : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं.यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीसह भाजपच्या नेतेमंडळींकडूनही धीरेंद्र शास्त्रीच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील धीरेंद्र शास्त्रींच्या संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देतानाच मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयातील काही पक्षप्रवेशानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह असून मी त्यामुळे व्यथित झालो आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो. महापुरुषांचा अपमान करण्याचं काही जणांचं काम जाणीवपूर्वक चाललं आहे असंही पवार यावेळी म्हणाले.

पवार म्हणाले, ज्याप्रकारे अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला आहे. तसाच महापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बेताल वक्तव्य करुन नवीन समस्या निर्माण करतात. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो. कुणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, कोण शाई फेकण्याचा प्रयत्न करतो, निषेधासाठी काळे झेंडे दाखविले जातात. हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांचा अपमान होऊ नये, यासाठी काहीतरी कायदा केला पाहिजे.

लाखो वारकरी बांधव तुकाराम महाराजांच्या वचनाला आजही मानतो. हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच आगामी अधिवेशनात हा मुद्दा आम्ही उपस्थित करुन यावर कायदा करण्याची मागणी करणार आहोत असंही मत अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी व्यक्त केले.

Ajit pawar On Dhirendra Shastri
Pune Crime: कोयत्याची दहशत थांबेना, शाळेत विद्यार्थ्यावर हल्ला; पुण्यात नक्की चाललयं काय?

अनिल परब (Anil Parab) यांचं वांद्रे येथील कार्यालय तोडल्यानंतर ठाकरे गट आणि सोमय्या यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यावर जो वाद निर्माण झाला आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती असेल त्या प्रत्येकाला संविधानाने काही अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करत असताना जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचा कुणीही भंग करु नये.

ही कृती योग्य की अयोग्य यावर भाष्य करण्याआधी या प्रकरणाची पार्श्वभूमी तपासावी लागेल. तरी सर्व व्यक्तींनी नियमांचा आणि कायद्याचा आदर केला पाहिजे असंही मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com