ठाकरेंच्या मास्टर सभेनंतर भाजप आक्रमक; ट्विट करुन टीका अन् प्रत्यूत्तर

Uddhav Thackeray | Shivsena : उद्धव ठाकरे यांची कोरोनानंतर पहिलीच जाहीर सभा
Uddhav Thackeray,Chandrkant Patil
Uddhav Thackeray,Chandrkant Patilsarkarnama

(Udhhav Thackeray Latest news)

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल, डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया देत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेतील भाषणावर निशाणा साधला आहे.

काल मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांची मास्टर सभा पार पडली. शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत कोरोना काळ संपल्यानंतरची ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यात त्यांनी विरोधी पक्ष भाजप, भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निशाणा साधला. तसेच शिवसैनिकांना संबोधित करत मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला.

Uddhav Thackeray,Chandrkant Patil
केंद्राने सुरक्षा दिलेल्या भाजप नेत्यांना ठाकरेंनी टिनपाट, टमरेल म्हणून हिणवले...

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. हे सुद्धा विसरले.

महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण ते विसरले की, पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून ठाकरे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. असा दिलासा गुजरात आणि इतर राज्यांनी दिला आहे. स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे, असाही टोला त्यांनी लागवला.

Uddhav Thackeray,Chandrkant Patil
हर्षवर्धन पाटलांनी आग्रह धरला अन्‌ अजितदादा आणि फडणवीस एकमेकांच्या शेजारी बसले!

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आपल्या सरकारमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले व ते पुन्हा मिळविण्यासाठी सरकार काहीच करत नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली, हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी उल्लेखही केला नाही. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला.

अतुल भातखळरांचाही निशाणा

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजचे भाषण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजप विरोधात गरळ ओकणारे असे भाषण होते. अत्यंत असंस्कृत आणि निलाजरे भाषण केले.

प्रसाद लाड यांच्याकडून राज ठाकरेंचे कौतूक

शिवजी पार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुजनायक मा. राजसाहेब ठाकरे, बाकी सगळे.... जय हिंद, जय महाराष्ट्र.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com