मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नुकताच औरंगाबाद दौरा झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावत शेतीची पाहणी केली. ठाकरेंनी आपल्या या दौऱ्याला प्रातिनिधीक भेट म्हंटले होते. यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे शेतकरऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली होती. ठाकरेंचा हा दौरा अवघ्या २४ मिनिटांत आटोपला अशीही टिका करण्यात आली. तर दुसरीकडे ठाकरेंना दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांचा आठवण आली, असे बोलण्यात आले. एकीकडे अशी टीका टिपण्णी होत असताना, आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे शेतकरऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. यामुळे या टीका टिपण्णीला आणखीनच धार येण्याची चिन्हे दिसत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगांव येथे नुकसानग्रस्त शेताची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका, खचून जाऊ नका, सरकारवर आसूड ओढा, असे आवाहन केले. आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे मुलगे आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.
आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे मुलगे आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. आदित्य उद्या (२७ ऑक्टो) रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. आदित्य पुणे जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचा पाहणी करणार आहेत. उद्या (२७ ऑक्टो) रोजी शिंदे - फडणवीसांचा दौरा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.