मुंबईकरांसाठी खूशखबर : लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मागील काही महिन्यांपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे.
Mumbai Local service will start from Independence day
Mumbai Local service will start from Independence day

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी खूशखबर दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबईकरांकडून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी होत होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून स्वातंत्र्य दिनापासून लोकल सुरू केल्या जाणार आहे. पण सर्वांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार नसून त्यासाठी लशीची अटक घालण्यात आली आहे. (Mumbai Local service will start from Independence day)

मागील काही महिन्यांपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. भाजपसह सर्व विरोधी पक्ष, प्रवासी संघटना तसेच नागरिकांसाठी ही सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यासाठी सरकारवरील दबावही वाढला होता. अखेर ठाकरे सरकारने ही मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी रात्री याबाबतची घोषणा केली. 

स्वातंत्र्य दिनापासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होईल. मात्र, कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असेल. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर चौदा दिवसांनी संबंधितांना लोकल प्रवास करता येईल. त्यासाठी एक अॅप तयार केले आहे. त्यावर अर्ज करता येईल. त्यावर लस घेतल्याची माहिती द्यावी लागेल. त्यावरून पास मिळेल. ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत, त्यांना महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातून पास देण्यात येईल. सध्या मुंबईत दोन्ही डोस घेतलेले 19 लाख नागरिक आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्रार्थनास्थळांबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय

उद्या टास्क फोर्स आढावा बैठक होणार असून त्यानंतर रेस्टॉरन्ट, मॉल, प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. यासाठी आठ-दहा दिवस लागतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पण तोपर्यंत संयम ढळू देऊ नका. उचापतीकारांना बळी न पडता सरकार जे सांगत आहे, ते आपण ऐकत आहात, याच कौतुक आहे. या कौतुकाचे मानकरी महाराष्ट्राचे नागरीक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हवामान विभागाने इशारा दिला होता पण किती प्रमाणात पाऊस पडेल, हे माहिती नव्हते. पण त्यातून प्रशासनाने चांगले काम केले. सुमारे साडे चार लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. यात जीवितहानी होऊ दिली नाही. पण दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली. राज्यात दरडी कोसळण्याचे, पूर येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा आता आपल्याला कायमस्वरूपी विचार करावा लागणार आहे. याबाबतच्या अहवालातील सुचना आठवडाभरात येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com