त्या दोघांचा आदर करा... पण त्यांना घाबरू नका : राहुल गांधींचा पटोलेंना संदेश!

काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होण्याचे नाना पटोलेंचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर...
Nana Patole-Rahul Gandhi
Nana Patole-Rahul Gandhi

मुंबई : नाना पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानभवन येथे आज सुपूर्द केला. गेल्या काही दिवसांपासून पटोले हे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होती आणि त्यासाठी ते विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असेही म्हटले जात होते. त्यानुसार काल 10 जनपथ, दिल्ली येथे राहुल गांधी यांची नानांनी भेट घेतल्यानंतर सगळ्या घडामोडींना वेग आला. अखेर आज दुपारी नाना पटोले यांनी मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात येऊन राजीनामा दिला. 

राहुल गांधी यांनी त्यांच्यापुढे दोन नेत्यांचे नाव घेत त्यांना आदर द्या पण त्यांना घाबरू नका, अशा शब्दांत संदेश दिला आहे. त्यातील एक नेता मराठवाड्यातील तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे नाना पटोले या दोन नेत्यांशी किती सलोख्याने वागणार, याची उत्सुकता आहे. 

पटोले हे विदर्भातील बहुजन समाजाचे आक्रमक नेते असून , १९९९ पासून साकोली विधानसभा मतदारसंघाचे सातत्याने ते प्रतिनिधित्व करतात. २००८ मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला `राम राम` ठोकून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आमदार झाले आणि २०१४ मध्ये भाजपच्याच चिन्हावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. पण पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोदींशी दोन हात करणारे नेते ठरले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले. याच वेळी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं भाजपशी दोन हात करणारे पाहिले नेते ठरल्यान नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ काँग्रेसने घातली. 1999 पासून आमदार असताना त्यांना मंत्री होण्याची इच्छा होती. मात्र दर वेळी त्यांच्या नावाचा पत्ता कट व्हायचा. आता अध्यक्ष झाल्यानंतर 

एक वर्षाहून अधिक काळ विधानसभा अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी आपल्या कार्यकाळात बऱ्याचदा त्यांच्या आक्रमक भूमिकेने मंत्र्यांवर एक नवी छाप पडण्याचा प्रयत्न केला. तसेच या पदावर असताना पक्ष संघटनेत अधिक काम करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम असून ती संधी मिळत नसल्याने त्यांनी बऱ्याचदा उघड नाराजी जाहीर केली होती. अखेर त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागणार असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. महाविकास आघाडीत विधासभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे . त्यामुळे काँग्रेसचाच विधानसभा अध्यक्ष झाल्यास अमीन पटेल - मुंबादेवी मतदारसंघ, सुरेश वरपूडकर- पाथ्री मतदारसंघ आणि ,संग्राम थोपटे - भोर मतदारसंघ यांची नावे चर्चेत आहेत.

किमान समान कार्यक्रमांतर्गत स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आणि मंत्रीमंडळातील काही खाती देण्यात आली आहेत. परंतु नाना पटोले यांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु काँग्रेसच्या गोटातील मंत्रिपदाची आणखी खाती उरलेली नाही आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करून विधानसभा अध्यक्षपद इतर पक्षाला देऊन मंत्रिमंडळातील एक जादा पद मिळवलं जाऊ शकतं. पण आता आगामी काळात या सगळ्या संदर्भात नेमकं चित्र स्पष्ट होईल. 

`बूथ एजंट केले तरी बूथ सक्षम करेन`

पदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की  मी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडलीय. यापुढे देखील शेतकऱ्यांसाठी झटत राहीन . शेतकऱ्यांमध्ये तीन कायद्यांसंदर्भात जनजागृती करेन. त्यासाठी रान पेटवणार आहे. पक्षाने आदेश दिल्यानुसार मी पगाचा राजीनामा दिला आहे. मला बूथ एजंट केले तरी तो सक्षम करेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com