‘आम्ही तयार, पण सहा महिने ग्रामपंचायत निवडणुका घेऊ नये’

सोयाबीन, कापूस, धान सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण सरकारने काडीचीही मदत केली नाही. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला आहे आणि मुख्यमंत्री घरात बसले आहेत. रुग्णांना उपचार मिळत नाही, रुग्णालयांत बेड्स नाहीत, ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. त्यामुळे या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. काही राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाल्याचीही माहिती आहे. पण कोरोनाचा उद्रेक ग्रामीण भागातही प्रचंड आहे. त्यामुळे अजून सहा महिने तरी निवडणूक घेऊ नये, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.

श्री बावनकुळे म्हणाले, कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही २४ तास आणि ३६५ दिवस तयार आहो. पण ग्रामीण भागांत कोरोनाची स्थिती गंभीर झालेली आहे आणि या परिस्थितीत निवडणुका घेतल्यास संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक टाळलेलीच बरी. निवडणूक आयोगाने जरी विचार केला असेल, तर तो सध्या थांबवावा आणि कोरोनाच्या संक्रमणात धोका पत्करू नये. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आमचे कार्यकर्ते तयार आहेत. पण कोरोनाचा प्रकोप अधिक वाढू नये, म्हणून निवडणुका सहा महिने टाळाव्या. 

गेल्या निवडणुकीत भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. यावेळी जरी राज्यात आमचे सरकार नाही, तरीही आम्ही अधिकाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवू. कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज आहेत. सोयाबीन, कापूस, धान सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण सरकारने काडीचीही मदत केली नाही. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला आहे आणि मुख्यमंत्री घरात बसले आहेत. रुग्णांना उपचार मिळत नाही, रुग्णालयांत बेड्स नाहीत, ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. त्यामुळे या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला असल्याचेही श्री बावनकुळे म्हणाले. 

जनतेने गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारचे काम पाहिले आहे. तसेही महाविकास आघाडी सरकार हे लोकांच्या मनातील सरकार नाही. राजकीय स्वार्थापोटी धरूनबांधून तयार झालेले हे सरकार आहे. म्हणूनच कोरोनाच्या भयावह स्थितीत सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. प्रत्येक आघाडीवर महाविकास आघाडी अपयशी झाली आहे. त्यांना आता लोक उभेही करणार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक त्यांनी या काळात घेतली तरी त्यांना यश मिळणार नाही. आम्ही कोणत्याही निवडणुकीची तयारी करत नाही, तर सदैव तयारच असतो. पण कोरोनाच्या स्थितीमुळे या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकाव्या, अशी सरकारला आणि निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com