सरकार म्हणून आम्ही तुकाराम मुंढेंच्या पाठीशीच : बाळासाहेब थोरात

सरकारमधील मंत्र्यांशीच नव्हे तर सर्व आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसातत्याने बोलत असतात. त्यांच्या क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन, त्यावर समाधान शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सोबतच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशीही ते नेमाने संवाद साधत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये संवाद नाही, हा आरोप श्री थोरात यांना खोडून काढला.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

नागपूर : महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींचा वाद राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. त्याचा शहराच्या विकासावरदेखील दुष्परीणाम होत असल्याची ओरड होतेय. या वादावर राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना बोलते केले असता ते म्हणाले, सरकार म्हणून आम्ही तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशीच आहोत.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी या विषयावर एक प्रश्‍न त्यांना विचारला होता. त्यावर ‘तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनीच उभे राहीले पहिजे‘, असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यानंतर आज महसूलमंत्री थोरातांना विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनीही असेच उत्तर दिले. त्यामुळे आयुक्तांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे दिसतेय. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही तेवढ्याच ताकतीने मुंढेंचा विरोध कायम ठेवला आहे. शनिवारी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत आयुक्तांना पुन्हा एकाकी पाडण्यात आले. पण तेवढ्याने मुंढे डगमगले नाहीत, असेच त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरुन जाणवतेय.

‘तो‘ आदेश फडणवीसांचाच
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला जाऊ नये, हा आदेश आपला नव्हे तर फडणविस सरकारच्या काळातील त्यांनीच दिलेला आदेश आहे. त्यांनी तेव्हा जे पेरले, तेच आता त्यांच्यासमोर उगवले आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाबाबत विचारले असता, ‘त्या विषयावर माझा अभ्यास नाही, त्यामुळे उत्तर देणार नाही‘, असे म्हणत त्यांनी या प्रश्‍नाला बगल दिली.

मुख्यमंत्री सहजतेने बोलणारे व्यक्तिमत्व
उद्धव ठाकरे हे सहजतेने बोलणारे व्यक्तिमत्व आहे. समोरच्याला समजून घेण्याची त्यांची पद्धत उत्तम आहे. राज्यात सर्वांशीच त्यांनी चांगला संवाद ठेवला आहे. सरकारमधील मंत्र्यांशीच नव्हे तर सर्व आमदारांशी ते सातत्याने बोलत असतात. त्यांच्या क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन, त्यावर समाधान शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सोबतच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशीही ते नेमाने संवाद साधत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये संवाद नाही, हा आरोप श्री थोरात यांना खोडून काढला.

वीज बिलात सवलत देण्यासाठी प्रयत्न
लॉकडाऊनच्या त्या तीन महिन्यांमध्ये वीज ग्राहकांना जासतीचे बिल देण्यात आले आणि त्याचा राज्यभर विरोध केला जातोय. याबाबत विचारले असता, वीज ग्राहकांना बिलामध्ये सवलत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com