राज्यातील राजकारण कुठं चाललंय; मलाच कळायचं बंद झालंय....

पोलिस किती लोकांना अडविणार, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, माझ्या घरी आई,वडील उपाशी असतील तर मी दुसऱ्याच्या घरातून चोरून आणू शकत नाही. याचा शासनाने विचार केला पाहिजे. नाही केला तर लोक करायचे ते करणारच आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांना पैसे देऊ शकत नाहीत तर रोजगार चालू करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Where is the politics in the state; I just don't know says MP Udayanraje Bhosale
Where is the politics in the state; I just don't know says MP Udayanraje Bhosale

सातारा : राज्यातील राजकारण सध्या कुठं चाललंय हे पाहून मलाच कळायचं बंद झाले आहे. मी कधी राजकारण केलेले नाही, समाजकारणच केले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्यामध्ये कोण काय करतंय ते बघायचे, असा इशारा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.   

उदयनराजे भोसले यांच्याशी आज साताऱ्यात पत्रकारांनी संवाद साधला. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परिस्थितीवर उदयनराजेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, कोरोनाची वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. लोकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कोरोनाबाबत एखादा निर्णय घ्यायचा झाला तर सर्व बाजूने विचार करणे बंधनकारक आहे.

शासनातील तज्ञ लोकांनी याचा विचार केला नसेल असे मी म्हणत नाही. कॉमन कोल्ड प्रमाणेच कोरोना आहे. प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जे काय करायचे ते केले पाहिजे. कारण कोरोना लवकर जाणार नाही. कोणी काहीही म्हणू देत. गो कोरोना, गो कोरोना.. असे आमचे मित्र रामदास आठवले म्हणाले होते. त्यामागे त्यांची चांगली भावना आहे.

पण कोरोनाची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. आपण सर्व निसर्गाच्या विरोधात आपण जातोय, हे नजरेआड करून चालणार नाही. या झाडांमुळे आपण जीवंत आहोत, त्यांचीच मोठ्याप्रमाणात तोड होत आहे. कुठेही कचरा टाकला जात आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहेत. शासनाने काय करायचे ते करू देत पण, लोकांनीही विचार केलेला आहे. लोकहिताचा आरोग्याचा विषय महत्वाचा असला तरी खायला मिळाले नाही तर काय करणार. त्यामुळेच लॉकडाऊन शिथिल केले पाहिजे.

पोलिस किती लोकांना अडविणार, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, माझ्या घरी आई,वडील उपाशी असतील तर मी दुसऱ्याच्या घरातून चोरून आणू शकत नाही. याचा शासनाने विचार केला पाहिजे. नाही केला तर लोक करायचे ते करणारच आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांना पैसे देऊ शकत नाहीत तर रोजगार चालू करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मिनी लॉकडाऊनच्या विरोधात लोकांत चिड आहे. लोकांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरणार का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मी कशाला लोकच रस्त्यावर उतरणार आहेत. अनेक व्यापारी व मोलमजूरी करणारे लोक मला भेटण्यासाठी आले होते. राज्यात लसीचा तुटवडा असून तीन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा राज्यात आहे.

याबाबत तुम्ही केंद्राकडून लसीची मदत होण्यासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, आपली लोकसंख्याच एवढी आहे की ग्रेट वॉल चायना तशी ग्रेट वॉट इंडिया बांधून टाका. आपल्याकडे इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या येथेच विकायला हव्यात. आपल्याला काहीही कुणाशी घेणे देणे नाही. कोरोनाने भितीदायक वातवरण निर्माण केले आहे. त्यातून घाबरूनच अनेकजण जात आहेत. 

खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. राज्याचे राजकारण सध्या कुठं चाललंय हे पाहून मलाच कळायचं बंद झाले आहे. मी कधी राजकारण केलेले नाही, समाजकारणच केले आहे. सध्या सुरू असलेले राजकारण हा करमणूकीचा भाग झाला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्यामध्ये कोण काय करतंय ते बघायचे, अशी टीका ही त्यांनी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com