आम्ही कोरोनाची लढाई जिंकू : मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केले आश्वस्त  

लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारणमहाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या ही पाच कोटी 71 लाख असून त्यासाठी लसीकरणासाठी 12 कोटी डोसेसची आवश्यकताआहे.
We will win the battle of Corona: CM reassures PM
We will win the battle of Corona: CM reassures PM

मुंबई : पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाउन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची मदत घेण्यात येत आहे. रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत, म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.

ऑनलाइन प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत. तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे अशी ही माहितीही दिली. 

रेमडेसिवर, लस पुरवठा वाढवावा..

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा, अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग  थोपवता आलेला आहे.

आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता. त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का, यावर मार्गदर्शन करावे. रेमडेसिवर किती उपयुक्त आहे, ते सांगता येत नाही. पण, रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही ते म्हणाले. रेमडेसिवर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहिल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.   

विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक 

राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली. यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबाबत योग्य तो अभ्यास व्हावा. तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार
आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले. 

ऑक्सिजन....
*महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर * राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स  * २५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था  * महाराष्ट्राला दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता * ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. * राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजनची उपलब्धता * जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल * वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन अतिरिक्त साठ्याची गरज * 'वायुदलाची' व 'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन' विभागाची मदत घेण्याची आवश्यकता * केंद्र शासनाकडे आपण १३,००० जम्बो सिलेंडर, ११०० व्हेंटीलेटर्स मागणी. 

रेमडेसिवर
रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिवरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज 70 हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज 27 हजार व्हायल्सचे वाटप रेमडेसिवर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिवर आयात करायला परवानगी देण्यात यावी. 

लसीकरण....

राज्याला लसीचा पुरवठा खूप धिम्या गतीने होत आहे. काल २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे ६.५ लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३.५ लक्ष डोस वापरण्यात आले. तसेच दोन लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार सद्यस्थितीत मी आपल्या सोबत बोलत असताना राज्यात सुमारे पाच लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. राज्य लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे.

लसीच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना  आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र, कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल. त्याविषयी अधिक स्पष्टता हवी. लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या ही पाच कोटी 71 लाख असून त्यासाठी  लसीकरणासाठी 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com