कऱ्हाड : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे अयोध्येत उद्या (बुधावारी) होणाऱ्या श्री राम मंदिराच्या शिलान्यासासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ३२ गडांवरील माती आणि पवित्र जल अयोध्येकडे पाठविले आहे. शिलान्यासावेळी हे जल व माती त्या मंदीराच्या पायथ्याला ठेवले जाणार आहे.
नेवासे येथील देवगड पिठाचे आचार्य भास्करगिरी महाराज यांच्याकडे ते जल सुपूर्त करण्यात आले आहे. शिलान्यासासाठी भास्करगिरी महाराज पुणे येथून अयोध्येला रवाना झाले आहेत. कऱ्हाड येथील शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शासह स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सह्याद्रीच्या कुशीतील गडदुर्गांवरील माती आणि जल एकत्रित केले होते.
त्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या सूचनेनुसार गडांवरील माती व जल जमा केले. त्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे ३२ गडांवरील माती आणि जल जमा करण्यात आली होती. ही मातची व जल भास्करगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आली. पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवप्रतिष्ठानचे केदार डोईफोडे, प्रदीप शिवले, अविनाश बापू मरकळे, पराशर मोने आणि आदित्य मांजरे यांनी माती व जल आचार्य भास्करगिरी महाराजांकडे सुपूर्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.