सातारा : सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करून मोदी सरकारला दणका दिला आहे. मात्र, हा शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा असला तरी कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो. न्यायालयाने कायद्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करणे अपेक्षित होते, त्यामुळे ही मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करत केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. शेतकरी संघटनांनी न्यायालयाच्या आदेशांचे स्वागत केले असले आंदोलनमात्र, कायम ठेवण्याचा निर्धार या संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्टीटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करुन मोदी सरकारला दणका दिला आहे. हा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जरी तात्पुरता दिलासा असला तरी हा कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करणे अपेक्षित होते. ही मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना, असा प्रश्न त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.