रेमडेसिव्हिरच्या साठेबाजांवर सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा...

खालच्या पातळीचे राजकारण भाजप करत असेल आणि केंद्राच्या धमक्या देऊन साठा वळविणारे महाराष्ट्रात मृत्यू झालेल्याला जबाबदार आहेत.महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असताना कंपनी इंजेक्शन नाहीत, असे सांगत असेल तर याची चौकशी करणाऱ्या पोलिस प्रशासनाची अडवणूक का केली जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
MLC Shashikant Shinde
MLC Shashikant Shinde

सातारा : कोणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारने साठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाई करावी हा अधिकार सरकारकडे आहेत. विरोधी पक्षनेते आले म्हणून त्यांना सोडण्यापेक्षा त्या कंपनीने साठा ठेवल्याबद्दल रेमडेसिव्हिर न मिळाल्याने ज्यांचे प्राण गेले आहेत त्याला जबाबदार पकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार शिंदे यांनी म्हंटले की, देशात आणि महाराष्ट्रात मेलेल्या लोकांच्यावर राजकारण करणाऱ्या भाजपा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. ब्रुक फार्मा सारखी कंपनी एवढ्या भीषण परिस्थितीत रेमडेसिव्हिरचा साठा ठेवत असेल. तो साठा एका पक्षाने मागितल्यावर त्यांना देण्याची तयारी करत असेल आणि सरकारने मागितले की साठा नाही, असे दाखवत असेल तर एवढे दिवस रेमडेसिव्हिर न मिळाल्याने राज्यात जे मृत्यू झाले आहेत. त्याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो.

अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण भाजप करत असेल आणि केंद्राच्या धमक्या देऊन साठा वळविणारे महाराष्ट्रात मृत्यू झालेल्याला जबाबदार आहेत. महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असताना कंपनी इंजेक्शन नाहीत, असे सांगत असेल तर याची चौकशी करणाऱ्या पोलिस प्रशासनाची अडवणूक का केली जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इंजेक्शन साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

 कोणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारने साठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाई करावी. हा अधिकार सरकारकडे आहेत. विरोधी पक्षनेते आले म्हणून त्यांना सोडण्यापेक्षा त्या कंपनीने साठा ठेवल्याबद्दल रेमडेसिव्हिर न मिळाल्याने ज्यांचे प्राण गेले आहेत. त्याला जबाबदार पकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी.

हा साठा कोणाच्या सांगण्यावरून राज्याला दिला गेला नाही,  याची सुद्धा माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी. कोणाच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी.संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा आहे. तसेच जेएनपीटी मध्ये निर्यातीसाठी अडकून पडलेला साठा सुद्धा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रासाठी वापरावा.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com