सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर देशद्रोही ठराल...

महात्मा गांधीच्या प्रतिमेला भगवे वस्त्र असलेल्या महिलेने गोळ्या झाडल्या. त्यांच्या प्रतिमेलाही गोळ्या घालाव्या वाटतात. यावरून हिंसा मनात किती भरली आहे, हे दिसून येते. या हिंसक कालखंडात पुन्हा एकदा गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, उंडाळकर यांचा वारसा घेऊन पुढे जायचे आहे.''
Freedom Fighter Dada Undalkar Memorial Day Program
Freedom Fighter Dada Undalkar Memorial Day Program

कऱ्हाड : देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलले, की त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही संबंध नव्हता ते गांधींचा वारसा सांगणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत. देशातील विचारांचा वारसा आणि वसा नष्ट करून जातीय उतरंड तयार करण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नव्या आंदोलनाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या 47 व्या स्मृतिदिन आणि विलासकाकांवरील "तेजगडचा एकलव्य' या स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, ॲड. विजयसिंह पाटील, प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह
मान्यवर उपस्थित होते. 

श्री. कुलकर्णी म्हणाले, "नवी पिढी आणि गेलेली पिढी याचा सांधा जोडण्याचे काम विलासकाकांनी केले. पूर्वीची जातीच्या उतरंडीची चातुर्वण व्यवस्था प्रस्थापित करून पुन्हा वाद निर्माण करण्यासाठी देशातील सत्ताधाऱ्यांची वाटचाल सुरू आहे. महात्मा गांधीच्या प्रतिमेला भगवे वस्त्र असलेल्या महिलेने गोळ्या झाडल्या. त्यांच्या प्रतिमेलाही गोळ्या घालाव्या वाटतात. यावरून हिंसा मनात किती भरली आहे, हे दिसून येते. या हिंसक कालखंडात पुन्हा एकदा गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, उंडाळकर यांचा वारसा घेऊन पुढे जायचे आहे.'' 

श्रीनिवास पाटील म्हणाले, "स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आयुष्य वेचले त्यांचे चिरंतन स्मरण देशपातळीवर फक्त उंडाळेत होते. त्यातून राष्ट्रीय विचार सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम विलासकाकांनी आयुष्यभर केले. कार्यकर्ता कसा शोधावा याची हातोटी त्यांना होती. समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवून वाडीवस्तीपर्यंत विकासकामे पोचवली.'' प्राचार्य
गणपतराव कणसे यांनी आभार मानले. 

उदयसिंह झाले भावनावश 

विलासकाकांच्या निधनानंतरचा पहिलाच कार्यक्रम असल्याचे जड  अंतकरणाने सांगून ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, "काकांनी  स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाबरोबरच समाज प्रबोधनाचा ज्ञानयज्ञ तेवत ठेवला. तो ज्ञानयज्ञ पुढे अखंडपणे सुरू ठेवला जाईल. समाज प्रबोधनाच्या या यज्ञात युवकांनी पुढाकार घ्यावा.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com