बीड : सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटतात, असे नाही. चळवळ चांगली केली तर त्या माध्यमातून प्रश्न सोडविता येतात. चळवळीत मनातील प्रामाणिकपणा असावा लागतो. केवळ पदासाठी चळवळ करणे कोणाच्याही मनात येऊ नये, असा सल्ला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून दिला. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे इतर वायफळ चर्चेला काहीही अर्थ नाही, असेही त्यांनी नमुद केले. Dhananjay Munde's advice to Sambhaji Raje: No movement for the post ....
मला मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये केले होते. यासंदर्भात श्री. मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील कोणताही प्रश्न सामान्य असो की असामान्य, तो बहुसंख्य लोकांचा असतो. त्या प्रश्नावर कोणीही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तो प्रश्न सोडवितो असे म्हणणे योग्य नाही. असे कधीच कोणाच्या बाबतीत होत नाही.
मी चळवळीतूनच मोठा झालेला कार्यकर्ता आहे. चळवळ चांगली केली तर त्या माध्यमातून प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी चळवळ करताना मनात प्रामाणिकपणा असावा लागतो. केवळ पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नयेमराठा आरक्षण प्रश्नाची सुनावणी सहा तारखे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की ओबीसी आरक्षणाचा असो, महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे हा विषय न्यायालयात मांडत आहे. यापुढेही मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या वादाबाबत ते म्हणाले, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे याबाबतच्या वायफळ चर्चेला काहीही अर्थ नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.