जळगाव : राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोलमडली आहे. मृतांचा आकडा सांगितला जातोय, त्यापेक्षा तो कितीतरी अधिक आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रच्रारातून श्री. महाजन आज महाराष्ट्रात आले. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांना रेमडेसिवर इंजेक्शन मिळत नाही. ऑक्सिजनची परिस्थितीही अशीच आहे.
राज्यात काय चाललं आहे, हे काहीच कळत नाही. मृतांचा आकडा ही वाढतोय. पण सरकार फारसे गंभीर दिसत नाही. शासन राज्यात पूर्णपणे फेल झाले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी ते आता मृतांचे आकडेही लपवित आहेत. मला काय बोलावे हे कळतच नाही. ज्या गांभीर्याने विषय घेतला पाहिजे त्या गांभीर्याने सरकार त्याकडे लक्ष देत नाही. केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.