मुख्यमंत्र्यांचा संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक; टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा उघड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक असा घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला असल्याची टीका श्री. चव्हाण यांनी केली आहे.
Chief Minister's decision to ban communication is revolutionary: Prithviraj Chavan
Chief Minister's decision to ban communication is revolutionary: Prithviraj Chavan

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत, असे म्हणत अंमलात आणलेल्या निर्णयावर राजकारण करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांवर केली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, राज्याची तिजोरी मोकळी आहे. अशावेळी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मोदी सरकारने मागील लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केली होती. 

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक असा घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला असल्याची टीका श्री. चव्हाण यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com