सांगली : केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करत आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राची परिस्थिती पाहता माणुसकीच्या नात्याने केंद्राने पाहावे, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका प्रशासनाचे आज कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त,महापौर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवरची परिस्थिती चिंताजनक आहे.
अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून सर्वांच्या बरोबर महाराष्ट्राला मदत मिळणे आवश्यक आहे, असे सांगून मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, महाराष्ट्राची परिस्थिती पाहता केंद्राकडून दुजाभाव करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने माणुसकीच्या भावनेने पाहिले पाहिजे. केंद्राने महाराष्ट्राच्या मागणीनुसार मदत केली पाहिजे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर ऑक्सिजन आणि रेमडेसिवर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्याचबरोबर लसीकरणाच्या बाबतीत सिरम कंपनीसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. लवकरच एकच दरात लसी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट करत पुणे आणि सांगली येथे भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून लवकरचं ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याचेही मंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.