सातारा : मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामींचे चॅट अत्यंत गंभीर असून केंद्र सरकारने याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉटस् ऑप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे.
यावरून आता गोस्वामींसह भाजप सरकार अडचणीत आले असून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्टीटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची सूचना केली आहे.
व्टीटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामींचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबद्दल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीने देखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.