मुंबई : "अरुण जेटली यांचा मृत्यू हा देशाला धक्का आहेच पण शिवसेनेची वैयक्तिक हानी आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा महत्वाचा खांब कोसळला आहे." अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
"जेटली यांचे व्यक्तिमत्व असामान्य होते.राजकीय जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहून ही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले.ते निष्णात वकील व धुरंधर नेते होते.'संकटमोचक' म्हणून त्यांनी मोदी सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजप मध्ये नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी ते होते. जेटलींनी राजकारणात राहून नाती व माणसे जपली", असे सांगून उद्धव पुढे म्हणाले की "राष्ट्रीय राजकारणातून जेटली यांचे जाणे हे राजकारणातून 'साहसी' व्यक्तीचे जाणे आहे. मी स्वतः त्यांचा चाहता होतो. त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे!"
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.