प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळेच 22 जणांचे बळी : अजित पवार

एल्फिन्स्टन स्थानकात पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या अपघातात 22 जणांनी जीव गमावला. हा अपघात केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे आणि त्यांनी केलेल्या दुर्लक्षपणामुळेच 22 मुंबईकर बळी गेले असून याला जबाबदार असलेल्या संबंधीत अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळेच 22 जणांचे बळी : अजित पवार

मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकात पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या अपघातात 22 जणांनी जीव गमावला. हा अपघात केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे आणि त्यांनी केलेल्या दुर्लक्षपणामुळेच 22 मुंबईकर बळी गेले असून याला जबाबदार असलेल्या संबंधीत अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला आहे.

एल्फिन्स्टन स्थानकात सकाळी घडलेली चेंगराचेंगरी अत्यंत दुर्दैवी असल्याचेही पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते तर आजची ही दुर्घटना टळली असती असे राष्ट्रवादीचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू होणे, रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल किती गंभीर आहे, हे आता स्पष्ट झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेचे पितळ यामुळे उघडे पडले असून या प्रकरणाची चौकशी व्हावी व हे ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाले, त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी, अशी मलिक यांनी मागणी केली आहे.

मन हेलावून टाकणारी दुर्घटना : पृथ्वीराज चव्हाण
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमुळे झालेला २७ प्रवाशांचा मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. जखमी व मृतांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने पाऊले उचलावीत, अशा भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केल्या.

खरेतर, विरोधक या नात्याने या दुर्घटनेचे विश्लेषण करून सरकारवर टीका करता येऊ शकेल. पण टीका करण्याची ही वेळ नाही. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणे, त्यांना आधार देणे, जखमींवर उपचार करणे, मदत देणे याला प्राथमिकता द्यायला हवी, असे चव्हाण म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com