बिहारची निवडणूक : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण आणि पुण्याच्या कलेक्टरची PMO नियुक्ती

नवलकिशोर राम हे बिहारचे भूमिपुत्र आहेत.सासाराम लोकसभेच्या खासदार आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नवलकिशोर राम हे भाचे आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यात पंतप्रधान कार्यालयातून बिहार साठी ज्या प्रकारच्या घोषणा होतील त्यामध्ये नवल किशोर राम या बिहारी भूमिपुत्र अधिकाऱ्याचा सर्वात मोठा वाटा असू शकतो, असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.
naval kishor RAM
naval kishor RAM

मुंबई :  राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असा प्रयोग करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता पुढील लक्ष बिहार विधानसभा निवडणुका हे ठरवले आहे.  सध्या बिहार मध्ये भारतीय जनता पक्षाची नितीश कुमार यांच्या सोबत सत्ता असली तरी आगामी निवडणुकांत भाजपाला स्वबळावर सत्तेचा सोपान सर करण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे.  बिहार विरुद्ध महाराष्ट्र असे या प्रकरणाला वळण मिळाले असून आगामी निवडणुकांत सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हे बिहार निवडणूकीचा अजेंडा होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान आजच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनाही पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून घेण्यात आले आहे.  नवलकिशोर राम हे बिहारचे भूमिपुत्र आहेत. सासाराम लोकसभेच्या खासदार आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नवलकिशोर राम हे भाचे आहेत.  त्यामुळे पुढील सहा महिन्यात पंतप्रधान कार्यालयातून बिहार साठी ज्या प्रकारच्या घोषणा होतील त्यामध्ये नवल किशोर राम या बिहारी भूमिपुत्र अधिकाऱ्याचा सर्वात मोठा वाटा असू शकतो, असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. 

याच पार्श्वभूमीवर नवलकिशोर राम यांच्या पंतप्रधान कार्यालयातील बदलीकडे सध्या पाहिले जात आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या नेत्या असल्यातरी सध्या बिहारच्या राजकीय परिघातून या घराण्याला फारसं महत्त्व लाभलेलं नाही. सासाराम लोकसभेच्या त्या प्रतिनिधित्व करत असताना काँग्रेसचे दिग्गज नेते बाबू जगजीवनराम यांच्या कन्या म्हणून मीराकुमार या सर्व परिचित आहेत . या घराण्याने राजकीय प्रगती तर केलीच पण त्याहून अधिक शैक्षणिक प्रगती देखील सिद्ध केली. स्वतः मीराकुमार यादेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर त्यांचे भाचे नवलकिशोर राम हे देखील राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सनदी अधिकारी अर्थातच जिल्हाधिकारी म्हणून पात्रता सिद्ध करण्यात यश मिळवले.  नवलकिशोर राम यांना पुणे जिल्हा अधिकारी पदावरून थेट पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर बदलण्यात आल्याने बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही नेमणूक भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

नवल किशोर राम हे पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती चार वर्षांसाठी राहणार आहे. ते 2007 मध्ये आयपीएस झाले. त्यानंतर त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. त्यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यांनी यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची बीड आणि औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. गेली दोन वर्षे ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कोरोना संकटाच्या काळात ते जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावी फिरून काम केले. गेल्या दोन वर्षात त्यांनी दाखविलेल्या कार्यक्षमेतेची दखल फेम इंडिया - आशिया पोस्ट यांनी घेतली. त्यांची देशातील सर्वोत्तम 50 जिल्हाधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. फेम इंडिया- आशिया पोस्ट लोकप्रिय जिल्हाधिकारी सर्वेक्षण 2020 मध्ये त्यांनी स्थान पटकावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com