'हे जनरल डायरचे सरकार आहे का?' नवाब मलिक यांचा सरकारला सवाल... 

'हे जनरल डायरचे सरकार आहे का?' नवाब मलिक यांचा सरकारला सवाल... 

मुंबई : एकीकडे शेतकर्‍यांना 'ऐ तू गप्प बस' अशा धमक्या आणि दुसरीकडे पुरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने पुरग्रस्त भागात १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. त्यावरही नवाब मलिक यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांना अशी दमदाटी करा किंवा जमावबंदी आदेश काढा, आम्ही घाबरणार नाही. उलट जनताच याचं उत्तर द्यायला तयार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com