विनायक मेटेंनी चव्हाणांना सोडले... मुख्यमंत्र्यांना भि़डले! : म्हणाले ही तर ठाकरेंची नौटंकी

सारेच केंद्राने करायचे का, असा मेटेंचा सवाल...
Vinayak mete-Uddhav
Vinayak mete-Uddhav

पुणे : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास आघाडी सरकारला टिकेचे लक्ष्य करण्याचा कार्य़क्रम शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी कायम ठेवला असून आज पुण्यात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आता राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पत्र देतात. यातून ते नौटंकी करीत असल्याचे स्पष्ट होते. मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी पुन्हा मेअखेर पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत मेटे हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या वेळी मात्र त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. (Vinayak Mete attacks CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)

‘‘आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे अपेक्षित होते. मात्र खुर्च्या उबवत बसविण्याचा एक कलमी कार्यक्रम महाविकासआघाडी सरकारकडून सुरू आहे. काही मराठा नेत्यांच्या माध्यमातून सरकार टिकवायचे असे सरकारच्या डोक्यात आहे. तसेच महाआघाडीला मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचे नाही,’’ अशीही टीका त्यांनी केली.

घटनेच्या १२० व्या दुरुस्ती संदर्भात व मराठा आरक्षणाबाबत शिवसंग्रामने दाखल केलेल्या याचिकेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मेटे यांनी हा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे अपेक्षित होते. पण ती केंद्राने दाखल केली. त्यामुळे आता केंद्रच सर्व करणार का? असा सवाल मेटे यांनी महाविकासआघाडी सरकार केला आहे.

मेटे म्हणाले, ‘‘न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल याबाबत सरकार कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. पत्र लिहून किंवा कोणाच्या हाता-पाया पडून आरक्षण मिळत नाही. त्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल. मात्र मुख्यमंत्री आता राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पत्र देतात. यातून ते नौटंकी करीत असल्याचे स्पष्ट होते. मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी पुन्हा मेअखेर पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.’’

तर मोर्चे काढणार :
आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यामुळे आम्ही पाच जूनच्या दरम्यान मोर्चा काढणार आहे. त्यानंतर १८ जूनला समाजाच्यावतीने तहसीलदार, जिल्हाधिका-यांना इशारा निवेदन देण्यात येर्इल. त्याच दिवशी आम्ही मंत्र्यांना रस्त्यांवर फिरून देणार नाही, अशी भूमिका घेणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com