मंगळवेढ्यात अतिवृष्टीग्रस्तांची विचारपूस करायला  खासदार आले नाहीत

..
JaySiddheshwarSwami
JaySiddheshwarSwami

मंगळवेढा  :  परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. मात्र  खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी अद्याप नुकसान पाहणीसाठी मतदारसंघात फिरकले नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यापासून तालुक्यात नदीकाठी पुराच्या तडाख्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आला.   ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने नदीकाठ बरोबर दक्षिण भागातील बहुतांश दुष्काळी गावात देखील झोडपून काढले. खरिपातील हातातोंडाशी आलेली पीके त्यामध्ये मका, बाजरी, तूर,सूर्यफूल,कांदा, मिरची, डाळिंब,द्राक्षे या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका या पावसाचा बसला आहे.

सरकारने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली असली तरी सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर राजकीय परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांच्या अपेक्षा केंद्र सरकारवर अवलंबून आहेत.  परंतु केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मतदारसंघात नुकसान झालेल्या गावांचा दौरा करून दिलासा देणे आवश्यक होते.  परंतु ते अद्याप या मतदारसंघात फिरकले नाही.

परतीच्या पावसाने सध्या तालुक्यामध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत दहा हजार हेक्‍टरचे पंचनामे झाले आहेत अजूनही पंचनाम्याचे काम चालू आहे.  यामध्ये बहुतांश शेतकरी वंचित राहणार असल्यामुळे सरसकट मदत जाहीर करावी ही मागणी होते आहे .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com