महाराष्ट्राला रक्तरंजित करणाऱ्यांना जनता हिशेब मागेल - मोदी

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चे काय काम, असा प्रश्‍न करणाऱ्यांना या राज्यातील जवानांचे बलिदान दिसत नाही. बॉम्ब स्फोट घडवून महाराष्ट्राला रक्तरंजित करणारे गुन्हेगार देश सोडून गेले. दुसऱ्या देशात हे गुन्हेगार कसे जाऊन बसले, याचा हिशेब या राज्यातील जनता, हा देश मागत आहे. महाराष्ट्र रक्तबंबाळ होत असताना त्यांच्या रंगरंगिल्या सुरू होत्या. त्याची पोलखोल होणार, या संकटाची चाहुल लागल्यानेच या देशातील तपासयंत्रणांना, अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचेही नाव न घेता अकोला येथील जाहीर सभेत केला.
महाराष्ट्राला रक्तरंजित करणाऱ्यांना जनता हिशेब मागेल - मोदी

अकोला : महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चे काय काम, असा प्रश्‍न करणाऱ्यांना या राज्यातील जवानांचे बलिदान दिसत नाही. बॉम्ब स्फोट घडवून महाराष्ट्राला रक्तरंजित करणारे गुन्हेगार देश सोडून गेले. दुसऱ्या देशात हे गुन्हेगार कसे जाऊन बसले, याचा हिशेब या राज्यातील जनता, हा देश मागत आहे. महाराष्ट्र रक्तबंबाळ होत असताना त्यांच्या रंगरंगिल्या सुरू होत्या. त्याची पोलखोल होणार, या संकटाची चाहुल लागल्यानेच या देशातील तपासयंत्रणांना, अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचेही नाव न घेता अकोला येथील जाहीर सभेत केला.    

पश्‍चिम विदर्भातील महायुतीच्या प्रचारार्थ अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी भाषणाला सुरुवात करतानाच मराठीमध्ये राजराजेश्‍वर नगरी आणि मोर्णा स्वच्छता अभियानाचा उल्लेख करून अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी अकोल्यातील जनतेला केंद्रातील मोदी सरकारने जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटविल्याचा निर्णय योग्य की अयोग्य याबाबत विचारणा केली. 

संपूर्ण देश सीमेपलिकडील दहशतवादाचे परिणाम भोगत होता. त्यात महाराष्ट्रातील जवानही शहिद झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितून आलेल्या जवानांना या देशावर होत असलेले आघात, देशाचे नुकसान बघवत नव्हते. तरीही कलम 370 चे महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय काम, असे विचारणाऱ्यांना डुंबून मरा, असा घनाघात पंतप्रधान मोदी यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, तुमच्या प्रतिक्रिया केवळ महाराष्ट्रातील जनता एेकत नाही तर, संपूण देश एेकत आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशेब देश मागणार आहे. या महाराष्ट्रात सर्व हिंसा सुरू होती, बॉम्ब स्फोट घटविले जात होते आणि हे स्फोट घडविणारे गुन्हेगार दुसऱ्या देशात जाऊन बसले. त्यांच्यासोबत कुणाचे कसे संबंध होते, हे सर्व उघड होत आहे. महाराष्ट्र रक्तबंबाळ करणाऱ्यांसोबत तुमचे कसे संबध होते? कसे रंगरंगेलिया सुरू होत्या, याची पोलखोल होणार होती व जनतेला त्याचे उत्तर द्यावे लागणार हे माहित होते. संकट दूर नाही, हे माहित असल्याने तपासयंत्रणा, अधिकाऱ्यांना लक्ष्यकरीत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हे असत्य फारकाळ टिकणार नाही. प्रत्येक गोष्टीचे उत्तर जनता तुम्हाला मागणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेले संविधान पूर्णपणे लागू होणार नाही, यासाठी प्रयत्न झाले. त्यांना भारतरत्न मिळू न देण्याचा प्रयत्न झाला, ते लोकही हेच होते, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. 

काँग्रेस, राष्ट्रवादी भ्रष्टाचाराची युती सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टाचाराची युती असल्याचा आरोप केला. त्यासोबतच त्यांनी जलयुक्त शिवारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com