`मौजमजा इगतपुरीतच करण्याचा आदेश`

`मौजमजा इगतपुरीतच करण्याचा आदेश`

इगतपुरी शहर : औरंगाबाद व जालना येथील स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जवळपास 330 मतदार सध्या इगतपुरीत पंचतारांकित सहलीवर आले असून, येथील पंचतारांकीत हॉटेल विक्रांत व हॉटेल बोध व्हॅली (रेन फॉरेस्ट) येथे त्यांची शाही व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे आणि काॅंग्रेसचे कुलकर्णी यांच्यात ही लढत होत आहेत.

मतदानाच्या आकड्यांसाठी आघाडीची जादुई जुळवा-जुळव करीत असताना मतदारांना एकत्रित न ठेवता वेगवेगळ्या दोन हॉटेलमध्ये व्यवस्था केलेली असुन, या ठिकाणी जाण्यास कोणालाही परवानगी नसल्याने, या राजकीय थाटाची चर्चा सध्या इगतपुरीत सुरु झाली आहे.

ही सर्व मतदार मंडळी 15 ऑगस्टपासुनच या ठिकाणी राजेशाही थाटात मौज करीत असल्याचे समजते. महायुती व महाआघाडीचे हे मतदार असून, एका अपक्ष उमेदवाराचाही त्यात समावेश आहे. या सर्वांवर देखरेखीसाठी अज्ञात राजकीय पहारेकरी ठेवण्यात आले असुन, त्यांना फोनवर बोलणे किंवा कुणाशी चर्चा करणे, संपर्क करण्यास बंदी आहे. जी काही मजा करायची, ती केवळ हॉटेलात करा, असा आदेशच असुन, मतदानासाठी त्यांना वेगवेगळ्या वाहनांतून नेले जाणार आहे. मतदान होईपर्यंत राजकीय कैदेत असलेले हे मतदार तहसील निहाय मतदान केंद्रावर गटाप्रमाणे पोहचविले जातील. यात एकुण 17 मतदान केंद्राचे मतदार असल्याचे समजते.

अज्ञातस्थळी म्हणुन ठेवण्यात आलेल्या या मतदारांना कोणालाही भेटता येऊ नये, यासाठी स्थानिक पोलीस, राजकीय नेते व हॉटेल परिसरातील व्यक्तींना या भागात बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आत होणाऱ्या बैठका व चर्चांची माहिती मिळू शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com