तिन्ही पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात; लवकरच काहीतरी घडेल

नारायण राणे यांना अजूनही भाजपचे सरकार येण्याची आशा!
narayan rane hopes for bjp government
narayan rane hopes for bjp government

कणकवली : राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊन कामे बंद करून ठेकेदारांना बोलवून घेणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. म्हणूनच राज्यात स्थापन झालेले हे सरकार विकास व प्रगतीसाठी नसून केवळ विकासकामांना स्थगिती देण्यासाठी आले आहे. म्हणूनच हे स्थगिती सरकार आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

येथील ओम निवासस्थानी राणे यांनी आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार भाजपचे आमदार नीतेश राणे आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, "राज्यात 28 नोव्हेंबरला आलेल्या सरकारने गेल्या दहा दिवसांत खाते वाटप काही केला नाही. तीन पक्षाचे मिळून तयार झालेले हे स्थगिती सरकार आहे. राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी उद्योगासाठी हे सरकार एकत्र आले नसून वैयक्तिक स्वार्थासाठी हे सरकार एकत्र आलेले आहे. या सरकार विरोधात आम्ही जनतेपर्यंत जाणार असून येत्या 15 ते 18 डिसेंबरच्या कालावधी भाजपचे सगळे लोकप्रतिनिधी गावागावांत जाऊन भाजपचे सरकार का आले नाही याची माहिती जनतेपर्यंत पोचणार आहेत. या सरकार व सत्ताधारी पक्षातील आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार आपल्या या संपर्कात आहेत. लवकरच काहीतरी घडेल.''

ते म्हणाले, ""तीन पक्षात एकमत नसल्याने विकास होऊ शकत नाही. त्यामुळे हे सरकार काही महिन्यातच कोसळेल. भाजप शिवसेना महायुती की निवडणूक पूर्वी एकवाक्‍यता होती. सगळे ठरलेले होते; मात्र शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला केले. जे गुन्हे मागे घेतले जात आहेत ते शक्‍य नाही. प्रत्येक गुन्हा न्यायालयात जातो. जेवढे गुन्हे मागे घेतले आहे ते घेता येत नाही. ते फक्त प्रसिद्धीसाठी आहे.''
शिवसेनेचे खासदार खासदार सरकारी अधिकाऱ्यांना आदेश देत आहे ते नियमबाह्य आहे. केंद्रात शिवसेना सत्तेत नाही. त्यामुळे खासदारांना असे आदेश देता येत नाहीत. जनतेची ते फसवणूक करीत आहेत. आढावा बैठका घेण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला. चिपी विमानतळ एप्रिलमध्ये सुरू होणार अशी घोषणा करण्याचा त्यांना अधिकार नाही. हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

विकासकामे ठप्प

जिल्ह्यातील विकासकामे सध्या ठप्प आहेत. मुळात सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये विकास प्रक्रियेची प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणे गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार अस्तित्वात असून नसल्यासारखे असल्याने जिल्ह्याच्या विकासावरही त्याचा परिणाम होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

जिल्हा बॅंक स्वबळावर लढवणार
जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका यापुढे भाजप स्वबळावरच लढवणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही स्वबळावर लढवली जाईल. याच बरोबर सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होतील असा दावाही राणे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com