चुकीची खोटी माहिती द्याल तर गाठ माझ्याशी आहे: आमदार सुलभा खोडके

चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नका, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, पुढच्या कारवाईला संबंधित अधिकाऱ्यांनी तयार राहावे, अशी तंबी आमदार सुलभा खोडके यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिली.
sulbha Khodke warns municipal officers
sulbha Khodke warns municipal officers

अमरावती :  शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करायचे आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. दर महिन्याला विभागनिहाय बैठकीसोबतच जनता दरबार घेतल्या जाईल. यामध्ये चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नका, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, पुढच्या कारवाईला संबंधित अधिकाऱ्यांनी तयार राहावे, अशी तंबी आमदार सुलभा खोडके यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिली.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महापालिकेत त्यांनी काल पहिली आढावा बैठक घेतली. मनपा आयुक्त संजय निपाणे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले, माजी महापौर किशोर शेळके, रिना नंदा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कामकाजावर आमदार सुलभा खोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना शहर अस्वच्छ आहे. घराघरांतून नियमित कचरा संकलन होत नाही, कचऱ्याचे कंटेनर रोज उचलले जात नाही. कचरा तेथेच पडून राहतो, अशा तक्रारी आल्याचा उल्लेख करून स्वच्छतेच्या कामकाजाची पध्दत व धोरण याची संपूर्ण माहिती देण्याची सूचना केली.

अमृत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण या विभागाच्या कामकाजाचीही माहिती त्यांनी घेतली. यावेळी नगरसेविका शोभा शिंदे, सुनीता भेले, माजी सभापती अविनाश मार्डीकर, प्रमोद महल्ले, कर्नलसिंग राहल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र महल्ले, माजी नगरसेविका जयश्री मोरे, गुड्डू धर्माळे, नितीन भेटाळू, संदीप आवारे, मनोज केवले उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना आमदार सुलभा खोडके म्हणाल्या, आज पहिलीच बैठक होती. त्यामुळे कामकाजाची माहिती घेणे इतकेच अपेक्षित होते. सर्व कामे व योजनांची माहिती मागविली आहे, ते तपासून पुढील महिन्यातील बैठकीत उत्तर मागू,त्यावेळी चुकीची माहिती दिल्या गेल्यास अधिकाऱ्यांनी सावध राहावे, कारवाई केल्या जाईल.

मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी महापालिकेवर असलेल्या दायित्वाची माहिती देत शासनाकडून निधी मिळवून देण्याची विनंती आमदारांना केली. यामध्ये कंत्राटदारांचे 32 कोटी, वीज वितरण कंपनीचे 4 कोटी, पाणीपुरवठ्याचे 55 कोटी, अकोली वळण रस्त्यातील भूसंपादनाचे 20 कोटी व सीमावर्ती भागासाठी 100 कोटींची मागणी शासनाकडे केल्याचे सांगितले. हा निधी मिळाल्यास मनपाचे दायित्व संपुष्टात येणार असल्याचे त्यांनी आमदारांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com