जिल्हाधिकाऱ्यांकडे दमडीही शिल्लक नसल्याचे समजताच जाधवांनी लावला अजितदादांना फोन

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पुकारण्यात आलेल्यालॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. त्यात वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन श्री.जाधव यांनी वैयक्तीक मदत करण्याचे जाहीर केले.
bhaskar jadhav
bhaskar jadhav

चिपळूण (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्हा प्रशासन कोरोनासारख्या महाभयानक रोगाचा सामना करत असताना जिल्हा प्रशासनाकडे नैसर्गिक आपत्ती कक्षात दमडीही शिल्लक नाही. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे ही खंत व्यक्त केल्यानंतर आमदार जाधव यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना फोन करून जिल्ह्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव पाठवा मी तातडीने निधी देतो असे आश्‍वासन भास्कर जाधवांना दिले.

चिपळूण तालुक्‍यात सतत चार दिवस अवकाळी पाऊस कोसळला. मंगळवारी चक्रीवादळ होऊन गुहागर व चिपळूण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिंपळी येथे वीज पडून एकाचा मृत्यु झाला. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार जाधव यांनी गुरूवारी चिपळूण व गुहागर तालुक्‍याचा दौरा केला. बोरगाव, बामणोली येथील नुकसानग्रस्तांनी भास्कर जाधवांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. पिंपळी येथील संतोष गंगाराम झुजम यांचा वीज पडून मृत्यु झाला. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळाली का ? अशी विचारणा आमदार जाधव यांनी तहसिलदारांकडे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप मदत आलेली नाही, असे तहसिलदारांनी सांगितले. त्यानंतर आमदार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून तत्काळ मदत देण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपत्ती कक्षात निधी नसल्याचे आमदार जाधव यांना सांगितले. त्यानंतर आमदार जाधव यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागात निधी देण्याची मागणी केली. अजित पवार यांनी तातडीने प्रस्ताव पाठवा मी निधी देतो, असे आश्‍वासन जाधवांना दिली. त्यानंतर जाधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. त्यामुळे लवकरच जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाला निधी उपलब्ध होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून श्री. जाधव यांनी चिपळूण व गुहागर मध्ये त्यांनी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीही केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन अधिकारी या भागात फिरकले नव्हते. बामणोली, वेळंब या गावांना मोठा तडाखा बसला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश श्री. जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. त्यात वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन श्री. जाधव यांनी वैयक्तीक मदत करण्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com