भुसावळ : एकनाथ खडसे राजकारणातले आमचे बाप आहेत ते मोठ्या मनाचेही आहेत आणि राजकारणात तसचं राहायला पाहिजे मात्र कानफुके लोक आले आणि त्यांचा बाजा वाजवून गेले असे, वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री पदमिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने भुसावळ येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले, "एकनाथराव खडसे यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं, मात्र मला मुलगा कधीच मानलं नाही,आणि म्हणूनच त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे.खडसे यांनी अशा लोकांना पाळले, त्यांचा त्यांनी रक्त ग्रुप तपासला नाही. नाथा भाऊ राजकारणातले आमचे बाप आहेत ते मोठ्या मनाचेही होते आणि राजकारणात तसच राहायला पाहिजे,"
राज्यात न झालेल्या युतीबाबत गुलाबराव पाटील म्हणाले, ''लोकसभा निवडणूकीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शाल श्रीफळ घेवून मातोश्रीवर गेले होते. तशाच पध्दतीने ते विधानसभा निवडणुकीनंतर मातोश्रीवर गेले असते तर कदाचित राज्यात वेगळे चित्र पहायला मिळाले असते. तेव्हाच समेट झाला असता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची कोणतीच इच्छा नव्हती. तो साधासुधा देवमाणूस आहे,''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.