व्हॉटस्‌अपवर विश्‍वास ठेवू नका, असे राज्यमंत्री  सावे का म्हणाले ? 

Atul_Save says don't believe the what's app
Atul_Save says don't believe the what's app

औरंगाबाद :  व्हॉटस्‌अपच्या  माहितीवर विश्‍वास ठेवू नका , असे आवाहन राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले आहे . भाजपचे आमदार असलेले अतुल सावे  यांनी स्वतः आणि त्यांच्या पक्षाने व्हाट्स अप आणि अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केलेला होता . 
 याबाबत खुलासा करताना  उद्योग आणि खनिमर्क,अल्पसंख्याक विकास  व वक्‍फ खात्यांचे  राज्यमंत्री अतुल सावे  म्हणाले, " दरम्यान व्हॉटस्‌अप वरून खोटी माहिती पसरवली जात आहे. महापालिका आयुक्‍तांची बदली झाल्याचा एक व्हॉटसअप मला आला. पाच वाजता आयुक्‍त जाणार आणि नवीन येणार असल्याची माहिती मला आली. त्यामूळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामासाठी मी तात्काळ आयुक्‍तांकडे गेलो,आणि आयुक्‍तांना भेटलो. 

"तेव्हा कळले त्यांची कुठलीच बदली झाली नाही. हा संदेश खोटा होता. या खोट्या संदेशाने माझीही पळापळ झाली. असाच एक खोटा संदेश शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात आला. यामूळे व्हॉटस्‌अप वरून येणारी माहितीवर विश्‍वास ठेवू नका," असेही राज्यमंत्री सावे यांनी सांगितले. 


" राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्र्यापैकी केवळ वंसतराव नाईक यांच्या सरकारने पुर्ण कार्यकाळ केला होता. मुख्यमंत्री नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे एमकमेव सरकारने आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे. हे भ्रष्टाचार  मुक्‍त सरकार असल्यामूळे हा कार्यकाळ पुर्ण झाला आहे," असेही श्री. सावे म्हणाले .  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. 27 ऑगस्टला ही यात्रा औरंगाबादेत दाखल होणार आहे. सांस्कृतिक क्रीडा मंडळावर मुख्यंमंत्र्याची जाहिर सभेही आणि त्यानंतर औरंगाबादेत मुक्‍कम असणार आहेत. या सभेची संपुर्ण जबाबदारी शहराध्यक्ष किशनंचद तनवाणी, आणि राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह प्रदेश व शहर आणि जिल्हा कार्यकारिणीवर टाकण्यात आलेली आहे. या निमित्ताने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दुष्टीने तयारी करणाऱ्यांनी मोठ-मोठे बॅनर लावून शक्‍ती प्रदर्शन करीत आहेत. 

राज्यमंत्री अतुल सावे म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकार हे भ्रष्टाचार मुक्‍त असल्यामूळे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाला असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सकाराच्या मंत्र्यावर आरोप केल्याचा प्रश्‍न माध्यमांनी विचारला. 

त्यास उत्तर देताना सावे म्हणाले, विरोधी पक्षानी सत्ताधारी मंत्र्यावरील भ्रष्टाचाराचे पुरावे अधिवेशनात मांडायला पाहीजे होते. अधिवेशनात सत्ताधाऱ्या प्रमाणे विरोधकांनाही तेवढच वेळ दिला जातो. तेथे प्रश्‍न मांडले नाही. त्यांनी केलेल्या आरोपात कुठलेच तथ्य नसल्याचेही राज्यमंत्री सावे म्हणाले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com