`माझे विधान भाजप, संघ, बजरंग दलातील लोकांच्या विरोधात होते'

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी शनिवारी आपले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर करीत वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली.
mim leader waris pathan apologies 
mim leader waris pathan apologies 

मुंबई ः एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी शनिवारी आपले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर करीत वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली. 

माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण आपले शब्द मागे घेतो. माझे विधान शंभर कोटी लोकांबद्दल नव्हते तर भाजप, संघ, बजरंग दलातील लोकांच्या विरोधात होते, असा खुलासाही त्यांनी केला. 
कर्नाटकातील गुलबर्ग्यात २१ फेब्रुवारी रोजी आयोजित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित सभेत बोलताना पठाण यांनी आम्ही पंधरा कोटी शंभर कोटींना भारी पडू, असे विधान केले होते. या विधानावरून मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. 

या पार्श्वभूमीवर पठाण यांनी आज खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत माफीनामा सादर केला. 

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. माझे विधान भाजप, संघ, बजरंग दलातील लोकांच्या विरोधात होते, ते हिंदूंच्या विरोधात नव्हते, असे पठाण म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com