हल्लाबोलमधून राष्ट्रवादीची कोल्हेकुई : विजय शिवतारे

''काँग्रेस, राष्ट्रवादीने विकासाच्या नावाने लबाडी केली आहे. आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनीच डल्ले मारून महाराष्ट्राची वाट लावली. त्यांनीच आता हल्लाबोलची कोल्हेकुई सुरू केली आहे. विकास काय असतो ते पुणे, पुरंदर येथे येऊन पाहा. तेथे राष्ट्रवादीला कोणी हुंगत नाही; पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात त्यांनी काय केले आहे हेच कळत नाही,'' असा टोला पालकमंत्री विजय शिवतारे यांनी येथे लगावला.
हल्लाबोलमधून राष्ट्रवादीची कोल्हेकुई : विजय शिवतारे

भुईंज : ''काँग्रेस, राष्ट्रवादीने विकासाच्या नावाने लबाडी केली आहे. आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनीच डल्ले मारून महाराष्ट्राची वाट लावली. त्यांनीच आता हल्लाबोलची कोल्हेकुई सुरू केली आहे. विकास काय असतो ते पुणे, पुरंदर येथे येऊन पाहा. तेथे राष्ट्रवादीला कोणी हुंगत नाही; पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात त्यांनी काय केले आहे हेच कळत नाही,'' असा टोला पालकमंत्री विजय शिवतारे यांनी येथे लगावला.

कळंभे (ता. वाई) येथे 65 लाख रुपयांच्या साकव पूल व रस्ता डांबरीकरण कामांच्या प्रारंभप्रसंगी शिवतारे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, राजेश कुंभारदरे, किरण खामकर, महिला संघटक शारदा जाधव, सरपंच सुनंदा गुरव उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, "शिवसेनेने चांगले काम करणारी नवीन पिढी तयार केली आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीने विकासाच्या नावाने लबाडी केली असून, आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनीच डल्ले मारून महाराष्ट्राची वाट लावली. त्यांनीच आता हल्लाबोलची कोल्हेकुई सुरू केली आहे. विकास काय असतो ते पुणे, पुरंदर येथे येऊन पाहा. तेथे राष्ट्रवादीला कोणी हुंगत नाही; पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात त्यांनी काय केले आहे हेच कळत नाही.''

ते पुढे म्हणाले, ''जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, मंत्रीही राष्ट्रवादीचे असताना जिहे-कटापूरच्या कामाला त्यांच्याकडून एक वीट लागली नाही, तर शरद पवार यांच्या नांदवळ गावालाही पाणी मिळाले नाही; परंतु मी पालकमंत्री झाल्यानंतर ते काम प्रथम पूर्ण केले आहे. वसना-वांगणाच्या पाण्याचे पूजन मी नांदवळला जाऊन केले आहे. इच्छाशक्ती
लागते ती नेत्याची. ती असेल तर मतदारसंघात विकासकामे होत असतात. चांगले नेतृत्व निवडणे ही देखील समाजाची जबाबदारी आहे.''

''घडतो तो माणूस, घडविते ती नियती या उक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला प्रतिकूल परिस्थितीत असामान्य बनवते ती फक्त शिवसेनाच. अशा शिवसेनेकडून मला मिळालेल्या संधीतून या जिल्ह्याचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'' असेही शिवतारे यांनी सांगितले. महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com