दाभोळकर, पानसरेंच्या हत्येप्रकरणीही भिडे, एकबोटेंची चौकशी करा : प्रा.कवाडे 

नरेंद्र दाभोळकर, कॉंम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील सहभागाच्या दृष्टीनेही मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांची चौकशी करण्यात यावी असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केली.
दाभोळकर, पानसरेंच्या हत्येप्रकरणीही भिडे, एकबोटेंची चौकशी करा : प्रा.कवाडे 

जळगाव : नरेंद्र दाभोळकर, कॉंम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील सहभागाच्यादृष्टीनेही मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांची चौकशी करण्यात यावी असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केली. 

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्या राजू मोरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा.कवाडे म्हणाले, "भीमा कोरेगाव दंगल भडकविल्याचा भिडे व एकबोटे यांच्यावर आरोप आहे. एकबोटेंना अटक झाली आहे. मात्र भिडेंना अटक झालेली नाही. त्यांच्या अटकेची मागणी दलीत संघटनाकडून करण्यात येत आहे. त्यातून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने एल्गार परिषदेत सहभाग घेणाऱ्या कार्यकर्त्यात्यावर धाडीचे सत्र सुरू केले असून हे सरकार सूडाचे राजकारण करीत आहे. सरकारने बाहेर असलेल्या भिडे यांना त्वरीत अटक करावीच त्यासोबत एकबोटे व भिडे यांची दाभोळकर,पानसरे, कलबुर्गी,गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा सहभागाच्या दिशेनेही तपास करावा," 

जातीव्यवस्था नष्ट करा 
देशातील आरक्षण हटविण्याचे या सरकारचे प्रयत्न असल्याचा आरोप करून प्रा. कवाडे म्हणाले, "आरक्षणाच्या विरोधात विष पेरण्याचे काम पध्दशीरपणे सुरू आहे. कि देशातील आरक्षण हटवायचे असेल तर प्रथम या देशातील जाती व्यवस्था नष्ट करण्यात यावी." आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी चुकीची असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले, देशातील गरीबी हटविण्यासाठी आरक्षण नाही, तर ज्यांना सामाजिक व शैक्षणिक हक्क मिळाले नाही, त्यांना ते मिळावे यासाठी आरक्षण आहे. 

देशात आर्थिक गोंधळ
देशात सध्या एटीएमध्ये नोटांचा खडखडाट असल्याच्याबाबत ते म्हणाले, देशात आज आर्थिक गोंधळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नोटांबदीपासून ही समस्या निर्माण झाली आहे. देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

विरोधकांनी एकत्र यावे
देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हटविण्याची गरच असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले, देशातील सर्व विरोध पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली ही एक चांगली बाब आहे. विरोधी पक्ष एकत्र आले आणि मतांचे विभाजन टाळले तर तर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करता येईल. कारण या सरकारमुळे जनता त्रस्त झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com