मंत्रीपद नाही महामंडळ तर द्या!

राज्यातील फडणवीस सरकारचा अखेरच्या हाेऊ घातलेल्या राज्य मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागण्यासाठी पश्चिम विदर्भातील भाजपच्या अनेक अामदारांनी अापल्या ‘गॉडफादर’ कडे माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. मंत्री पद मिळणार नसेल तर किमान महामंडळ तरी मिळावे, अशी फिल्डिंग लावण्यात येत असल्याने पक्षातंर्गत राजकीय वातावरण तापले अाहे.
मंत्रीपद नाही महामंडळ तर द्या!

अकाेला : राज्यातील फडणवीस सरकारचा अखेरच्या हाेऊ घातलेल्या राज्य मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागण्यासाठी पश्चिम विदर्भातील भाजपच्या अनेक अामदारांनी अापल्या ‘गॉडफादर’ कडे माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. मंत्री पद मिळणार नसेल तर किमान महामंडळ तरी मिळावे, अशी फिल्डिंग लावण्यात येत असल्याने पक्षातंर्गत राजकीय वातावरण तापले अाहे. 

अागामी लाेकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य मंत्रीमंडळात माेठे फेरबदल हाेण्याचे संकेत अाहेत. मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेसह तीन वर्षांपासून रखडलेल्या विविध महामंडळावरील नियुक्त्याही करण्यात येणार असल्याच्या चर्चेलाही उधाण अाले अाहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा विस्तार असल्याने पश्चिम विदर्भातील अनेक जेष्ठ व युवा अामदारांनी मंत्रीमंडळात स्थान मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. 

पश्चिम विदर्भातून सध्या फडणवीस सरकारमध्ये कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, उद्याेग राज्यमंत्री प्रविण पाेटे पाटील हे मंत्री अाहेत. मात्र, यापैकी मदन येरावार साेडले तर भाऊसाहेब फुंडकर, डॉ. पाटील अाणि प्रविण पाेटे हे विधान परिषद सदस्य असून त्यांना थेट मंत्रीपद मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या अामदारांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. 

पश्चिम विदर्भात भाजपमध्ये अामदार चैनसुख संचेती, अामदार डॉ. संजय कुटे, अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार डॉ. अनिल बाेंडे, अामदार रणधीर सावरकर, अामदार प्रकाश भारसाकळे, अामदार लखन मलीक, अामदार राजेंद्र पाटणी यांच्यासह काही जेष्ठ व पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेले अामदार अाहेत. त्यामुळे पक्ष विस्तारासाेबत मतदारसंघात केलेली विकास कामे अाणि स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिल्याने यशाचे मुल्यमापन करून अागामी मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी अपेक्षा अामदारांसह त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अाहे. मंत्रीमंडळात स्थान नाही मिळाले तर ठीक, अन्यथा किमान महामंडळावर तरी वर्णी लागावी, यासाठी काही नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले अाहे. भाजप-शिवसेनेतील सत्ता वाटपाच्या सुत्र ठरले अाहे. त्यामुळे मंत्रीपदासह महामंडळांवर कोणाची वर्णी लागते, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com