मुंबईचा मुळ मालकच हतबल ,राज ठाकरेंना चिंता 

मुंबईचा मुळ मालकच हतबल ,राज ठाकरेंना चिंता 

पुणे : मुंबईचा मुळ मालकच हतबल आहे. तो मुंबईबाहेर फेकला जात असल्याची खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

ठाण्यातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत राज बोलत होते. यावेळी राज यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आपल्या नेहमीच शैलीत हल्ला चढविला. राज म्हणाले, जम्मू-काश्‍मिरातील 370 कलमाचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे. देशभरातील परप्रांतिय लोंढे सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात येत आहेत.

महाराष्ट्रात उद्योगावर मोठे संकट आहे पण, यावर कोणी काहीच बोलत नाहीत. नोकऱ्या गेल्या आहेत, शेतकरी आत्महत्या करताहेत मात्र सरकार गप्प आहे. कोणी बोलण्यास तयार नाही. जर तुमच्यात संपात नसेल तर काय उपयोग असा सवालही त्यांनी केली.

पोलिसांना अधिकार द्या क्राईमरेट कमी करून दाखवितो असेही ते म्हणाले. 
आज मुंबईचे मुळ मालकच हतबल होत आहे. एकीकाळी मराठी माणूस मुळ मुंबईत दिसत होता. तो आता कमी होऊ लागला आहे असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com