मराठी भाषा खात्याचे मंत्री तावडेंनी कवितेसाठी एक दिवस का दिला ?

वर्षा पवार-तावडे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या 50 कवितांचा संग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे रविवारी प्रकाशित करण्यात आला.
tawde-&-poetry
tawde-&-poetry

मुंबई :  शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, अल्पसंख्याक आणि मराठी भाषा अशा अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळणाऱ्या विनोद तावडे यांनी आपला व्यस्त दिनक्रम बाजूला ठेवून एक संपूर्ण दिवस मराठी कवितेसाठी दिला. निमित्त होते विनोद तावडे यांच्या सौभाग्यवती  वर्षा पवार-तावडे यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे.

या कार्यक्रमाला भाजपचे आमदार आशिष शेलार आणि आमदार पराग आळवणी या दोघांना तावडे दांपत्याचे अभाविपच्या काळापासून स्नेही असल्याने निमंत्रण होते. अन्य कोणीही राजकीय नेते मंडळी या कार्यक्रमाला दिसली नाहीत. विनोद तावडे यांनी त्यांच्या गृहमंत्र्यांचा पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन असल्याने मंत्रिपदाची झूल उतरवून या कार्यक्रमाच्या तयारीत झोकून दिले होते . 

वर्षा पवार-तावडे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या 50 कवितांचा संग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे रविवारी प्रकाशित करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या हस्ते आणि भारती स्त्री शक्तीच्या निर्मला आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

"मनाला दार असतंच' या काव्यसंग्रहामध्ये कुटुंबातील नाती-गोती या विषयावर काव्य आहे. स्त्रीची एक वेगळी ओळख उलगडणारे काव्य आहे. एक संवेदनशील महिला आणि कार्यकर्ती या दोन्ही भूमिकेतून त्या व्यक्त होतात. त्यामुळे वर्षा पवार- तावडे यांचा हा पहिला प्रयत्न कौतुकास्पद आहे," असे प्रतिपादन आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा कवयित्री आणि ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी या वेळी केले.

"कार्यकर्ता म्हणून जग अनुभवताना मी लिहीत होते पण कविता लेखन केलेले नव्हते. आलेले फॉरवर्ड वाचता वाचता त्याला थोडक्‍यात उत्तर देण्यासाठी कवितांचा पर्याय समोर आला आणि हे लेखन झाले," असे मनोगत कवयित्री वर्षा पवार- तावडे यांनी केले.

निर्मला आपटे यांनी वर्षा पवार तावडे यांच्या कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाचे विवेचन या वेळी केले. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते किशोर कदम यांनी निवडक कवितांचे वाचन केले.

प्रकाशनाच्या वतीने देवयानी कुलकर्णी - अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तरा मोने व अन्वी तावडे यांनी सूत्रसंचालन केले. तर विनोद तावडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com