महाराष्ट्र पेटला असताना राज्याच्या पडद्यावरून सरकार गायब : संजय राऊत 

महाराष्ट्र पेटला असताना राज्याच्या पडद्यावरून सरकार गायब : संजय राऊत 

पुणे : महाराष्ट्र पेटला असताना राज्याच्या पडद्यावरून सरकार गायब झाले असल्याचा टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केला. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, की महाराष्ट्र पेटत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या मागणीकडे सरकारने गंभीरपणे पाहिले पाहिजे. या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अयोध्येतील राम मंदिराबरोबर मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल हे सरकारने पाहिले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आंदोलनाबाबत जे विधान केले तेही धक्कादायक होते. 

दरम्यान, मराठा समाजाने आरक्षणासह केलेल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंब दिला असून सरकारने त्यांच्या मागण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com